दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे.
सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आहे. त्यांचे वडील श्री बालाजीराव फुले यांनी सन 2000 मध्ये पंचायत समितीचे उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळात अनेक गावांमध्ये विकासकामे झाली, अनेक सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. “काम असलं की बालाजीराव फुलेंच्या दारी गेलं की हात धरून काम करून देणारा माणूस होता” अशी लोकांची आजही भावनिक आठवण आहे. हाच सेवाभाव, लोकाभिमुख वृत्ती आणि सर्वसमावेशक विचार आज सौ. कोमल कमलाकर फुले यांच्या उमेदवारीला बळ देत आहे. त्या प्रामुख्याने महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण व विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, बेरोजगार तरुणांसाठी मार्गदर्शन, ग्रामविकासात पारदर्शकता यांना प्राधान्य देण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. दावनगाव गणातील नागरिकांमध्ये असा सूर ऐकू येत आहे की, “घराणेशाही किंवा फक्त राजकारणासाठी नव्हे, तर काम करण्यासाठी आणि सहज भेटणारी, सामान्यांशी मिसळणारी व्यक्ती पंचायत समितीत पाहिजे आणि त्या दृष्टीने कोमल ताई योग्य उमेदवार आहेत.” सौ. कोमल कमलाकर फुले या स्वतःला “लोकांच्या घरी जाऊन त्यांची समस्या समजून घेणारी लोकप्रतिनिधी” म्हणून पाहू इच्छितात. त्यांचे म्हणणे आहे “आपल्या गणातील प्रत्येक कुटुंबाला प्रशासनापर्यंत पोहोचवणारा दुवा व्हायचे आहे. पद हे साधन आहे, उद्दिष्ट नाही; उद्दिष्ट आहे – सर्वसामान्यांचे आयुष्य थोडं तरी सोपं करणे.” दावनगाव गणातील मतदारांच्या अपेक्षा, स्थानिक प्रश्न आणि विकासाच्या गरजा जाणणारी, आणि घराघरातून विश्वास मिळवणारी उमेदवार म्हणून सौ. कोमल कमलाकर फुले यांच्याकडे पाहिले जात आहे.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा