डोळस आणि चिंतनशील कवी : शंकर बोईनवाड ------------------‐-‐------------------ कवी आणि साहित्यिक हे समाजाचे जागृत डोळे असतात. आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने ते समाजातील भावना, विचार, संस्कृती आणि जीवनमूल्ये यांचे जतन करतात. त्यांच्या शब्दांतून माणसाच्या सुख-दुःखाचे, आशा-आकांक्षांचे आणि संघर्षांचे चित्र जिवंत होते. कवीच्या संवेदनशील मनाला निसर्ग, माणुसकी आणि जीवनातील विविध अनुभवांची सुंदर जाण असते. तो आपल्या कवितांमधून समाजाला विचार करायला लावतो, तर साहित्यिक आपल्या कथा, कादंबऱ्या, निबंध आणि लेखांच्या माध्यमातून समाजाला दिशा देतो. त्यांच्या साहित्यकृती केवळ मनोरंजन करत नाहीत, तर वाचकांच्या मनात संस्कार, प्रेरणा आणि सकारात्मक विचार मांडतात अशा नामावलीत शंकर बोईनवाड यांचे नाव अग्रक्रमावर घ्यावे लागेल. बोईनवाड हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून स्वतंत्र विचारांची एक समृद्ध संस्कृती आहे. त्यांनी नायगावमध्ये साहित्याचे नवे आयाम निर्माण केले. विविध सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नायगावच्या साहित्यिक वातावरणाला समृद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे. दैन...