मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि सामाजिक जाण व भान असणारे एक संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व : प्राचार्य एकनाथ पाटोदेकर*

*न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि सामाजिक जाण व भान असणारे एक संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व : प्राचार्य एकनाथ पाटोदेकर* ---------------------------------------     माणसाच्या जीवनात त्याला वेळोवेळी संघर्ष करावा लागतो. दुःखाच्या, अडचणीच्या तसेच उणीवांच्या झळा सोसून देखील आपल्या विचाराशी व तत्वाशी कधीही तडजोड न करता संकटाशी दोन हात करण्याची जिद्द बाळगून जीवनात संघर्ष करावा लागतो. ही शिकवण अंगीकारूण, आपण नेहमीच इतराच्या कामी यावे. संकटकाळी, गरजेच्यावेळी इतरांसाठी धावून जावे. असा वसा घेवून जीवन जगणारी माणसं दुर्मिळच... काही माणसं अशीच भावना उराशी बाळगून जीवन जगत असतात. त्यापैकीच प्राचार्य एकनाथ पाटोदेकर हे एक नाव...        प्राचार्य एकनाथ दत्तराम पाटोदेकर हे माध्यमिक आश्रमशाळा व उच्च माध्यमिक विदयालय कुंटूर तांडा येथे जवळपास 32 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (थडी ) सारख्या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म दि. 1 जून 1965 रोजी झाला.. गावातच प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी कुंडलवाडी येथे पायी येणे - जाणे कर...

*ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे : प्राचार्य मनोहर पवार*

*ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे : प्राचार्य मनोहर पवार* ----------------------------------------       सोमठाणा ता. नायगाव जि. नांदेड या छोट्याशा गावात अतिशय गरीब कुटुंबात सामाजिक अस्तित्व नाकारलेल्या समाजात जन्माला आलेले मनोहर पवार यांनी पराकोटीची जिद्द,चिकाटी व अपार मेहनतीच्या बळावर अगदी वयाच्या 24 व्या वर्षी आपल्या गावात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्था सुरु करून शैक्षणिक चळवळ वाढीस नेली. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून सवरून आपल्या पायावर उभी राहिली.ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे प्राचार्य मनोहर पवार यांचा आज 62 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...        मनोहर कलावतीबाई पुंडलिकराव पवार यांचा जन्म दि. 1 जून 1964 रोजी सोमठाणा ता. नायगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असतानाही केवळ जिद्द चिकाटीने त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा, माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल उमरी व महाविद्यालयीन शिक्षण नांदेड य...

*टी. एस. कल्लूरकर ( दादा ) एक* *आधारस्तंभ*

*टी. एस. कल्लूरकर ( दादा ) एक* *आधारस्तंभ*  --------------------------------------           बालाघाट पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या कल्लूर ता. उदगीर जि. लातूर येथील एका सामान्य कुटुंबातील पिता संग्रामबाबा व माता द्रौपदाबाई यांच्या पोटी दि. 01: 06: 1947 रोजी एक पुत्ररत्न जन्मास आले.त्या पुत्राचे नाव तुकाराम असे ठेवण्यात आले. वडिलांना बाबा तर आईला माय असे म्हणत असत. गाव लहान असल्याने कल्लूर येथे दुसरीपर्यंतच शाळा होती. तीही विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भरत असे. वडिलांचा सुतारकीचा व्यवसाय होता. म्हणून पंचक्रोशीत बाबांना संग्रामबाबा या नावानेच ओळखले जात असे. माय पहाटे लवकर उठून जात्यावर दळण दळत असे. माय ज्वारी दळत असताना स्वतःच रचलेल्या ओव्या म्हणत असे. मायने अनेक ओव्या रचलेल्या होत्या पण कोणीही या ओव्यांचा संग्रह करून ठेवले नाही. याची खंत प्रत्येकांना वाटते.अशा कठीण प्रसंगी त्यांनी आपल्या दोन मुलांना व एका मुलीला शिक्षण दिले. माय व बाबा अशिक्षित होते पण आपल्या मुलांनी खूप शिकून मोठी सरकारी नोकरी करावी असे वाटे. बाबा म्हणत, " तुला काय पाहिजे ते माग पण...

*किरण बापूरे यांच्या ‘दिलकश रुबाईयां’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन‘*

*किरण बापूरे यांच्या ‘दिलकश रुबाईयां’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन‘* उदगीर : येथील बिदर गेट परिसरातील हॉटेल आनंद येथे कवी हावगीराव उर्फ किरण बापूरे लिखित ‘दिलकश रुबाईयां’ या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आनंदी मॉर्निंग ग्रुप आणि जयवंतराव पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गट शिक्षण अधिकारी के. आर. शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शंकर बोईनवाड, जमहूर ज्युनियर कॉलेजचे प्रा. महेमूद अली जहागिरदार तसेच आनंदी गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष शरद कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी किरण बापूरे यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ कला शिक्षक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दिगंबर जाधव यांना “राज्य आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” जाहीर झाल्याबद्दल ग...

*शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूलचे यश*

*शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूलचे यश*  ---------------------------------------  उदगीर/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूल, डॅम रोड उदगीर विद्यालयाचे प्रज्ञा स्वप्निल शृंगारे व मनुश्री उद्धव चामवाड ही विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या  विद्यार्थ्यांना सहशिक्षक साधना बेंबळगे, दत्ता गुरदाळकर, शुभम उदगीरकर, प्रीती चिल्लरगे, नंदिनी वाडकर यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रो. बसवराज स्वामी, मुख्याध्यापिका जयश्री बी. एस. यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. या गुणवंताचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बालाजी रेड्डी यांच्यामुळे शिवसेनेला गती मिळाली - स्वप्नील अण्णा जाधव

बालाजी रेड्डी यांच्यामुळे शिवसेनेला गती मिळाली - स्वप्नील अण्णा जाधव  उदगीर (प्रतिनिधी )  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गतिमान करण्यासाठी आणि संघटन उभारण्यासाठी जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यांनी संघटन कुशल नेतृत्व दाखवत सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन, "गाव तिथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक" मोहीम राबवल्यामुळे लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात शिवसेनेने चांगलेच बाळसे धरले आहे. असे विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल (अण्णा) अनिल जाधव यांनी व्यक्त केले.  बालाजी भाऊ रेड्डी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून स्वप्नील अण्णा जाधव यांच्या मित्र परिवाराकडून बालाजी रेड्डी सत्कार आयोजित करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बालाजी रेड्डी यांना अभिष्टचिंतन करतानाच स्वप्निल अण्णा जाधव यांनी बालाजी रेड्डी यांनी ग्रामीण भागामध्ये शिवसेनेसाठी किती कष्ट घेतले, आणि संघटन उभारणीसाठी त्यांनी केलेल्या एकूण कार्याचा आढावा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा बळ देण्यासाठी सर्व शिवसैनिक...

सामाजिक जाणीवा जोपासणारे प्रशासकीय अधिकारी : श्री. प्रवीणजी फुलारी

सामाजिक जाणीवा जोपासणारे प्रशासकीय अधिकारी : श्री. प्रवीणजी फुलारी  ---------------------------------------     सामान्य कुटुंबातून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मोठ्या हुद्द्यावर गेलेली लोकं सामाजिक जाण, भान जोपासत सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांसाठी कामे करणारी फार कमी लोकं आहेत. त्यापैकीच छ. संभाजीनगर चे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. प्रवीणजी फुलारी हे एक. एका शिक्षकाचा मुलगा वडिलांचे शिस्त, क्षमता आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवून संस्कार घेवून प्रशासनात सामान्य, गोरगरीब यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. श्री. प्रवीणजी फुलारी साहेबांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांनी प्रशासनात राहून प्रामाणिक सेवा जोपासली त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...श्री. प्रविण बाबुराव फुलारी यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे एका सामान्य कुटुंबात झाला. साहेबाचे वडील श्री. बाबुराव फुलारी हे शिक्षक होते त्यामुळे शिस्तीचे, संस्काराचे व अध्यात्मचे धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. त्या बळावरच फुलारी साहेबांनी प्रशासनात आपली यशस्वी वाटचा...