मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*एक सेवाभावी व्यक्तिमत्व : गोपाळराव कांबळे*

*एक सेवाभावी व्यक्तिमत्व : गोपाळराव कांबळे* ------------------------------------      सेवाभावी वृतीने आयुष्यभर विद्यार्थी घडवीणारे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षण देणारे सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. गोपाळराव कांबळे हे होत. आज शिक्षक दिन त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.          श्री गोपाळराव मरेप्पा कांबळे यांचा जन्म दि.2० जानेवारी १६६३ रोजी लखनगाव ता. भालकी जि. बिदर येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण जि. प. हायस्कूल लखनगाव, उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर, अध्यापन पदविका मराठी बी. टी. आय. बिदर येथून पूर्ण केली., पदवी व पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे बहिस्थ पध्दतीने घेतले.बी.एड.व एम.एड.चे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, येथुन घेतले. एम. ए. राज्यशास्त्र ही पदवीही त्यांनी प्राप्त केली.श्री. कांबळे सर हे १२ वी ला असताना पाच वेळा नापास झाले पण शिक्षणाची ज...

*उपक्रमशील शिक्षक : सुनील कल्लूरकर

*उपक्रमशील शिक्षक : सुनील कल्लूरकर* ------------------------------------      आपल्या वडिलांच्या संस्कारातून वाढलेले, प्रामाणिकपणे सेवा बजावणारे उपक्रमशील आदर्श शिक्षक श्री.सुनील कलूरकर यांचा थोडक्यात परिचय करून देणारा हा लेख खास शिक्षक दिनानिमित्त....       श्री.सुनील तुकाराम कल्लूरकर यांचा जन्म दि.१२ ऑगस्ट १९७८ रोजी कल्लूर ता.उदगीर जि.लातूर येथे एका सुशिक्षित कुटुंबात झाला. वडील शिक्षक असल्यामुळे श्री.सुनील कल्लूरकर यांना शिक्षणाची कसलीच अडचण भासली नाही.त्यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा.शाळा कल्लूर, माध्यमिक शिक्षण समर्थ विद्यालय एकुरका (रोड) ता.उदगीर येथे झाले. उच्च माध्यमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर, पदव्युत्तर शिक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर येथे झाले. अध्यापन पदवीचे शिक्षण पिलेज कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च सेंटर चेंबूर नाका, मुंबई येथे झाले.शिक्षण संपल्यावर श्री. सुनील कल्लूरकर हे दि.१० जून २००२ रोजी उदगीर येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालय उदगीर येथे माध्यमिक शिक्षक म्हणून रुजू झाले. कायम विनाअनुदानित...

जि. प. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील : जि. प. सदस्य डॉ. सोमवंशी

*जि. प. शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील : जि. प. सदस्य डॉ. सोमवंशी* ------------------------------------ उदगीर / प्रतिनिधी : ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे मत निडेबन जिल्हा परिषद गटाचे सदस्य डॉ. दिपक सोमवंशी यांनी व्यक्त केले. ते निडेबन गटात येणाऱ्या तोंडचिर येथील पी. एम. श्री. जिल्हा परिषद शाळेत शाळाभेटी दरम्यान बोलत होते. यावेळी सरपंच प्र. सुदर्शन पाटील यांचेसह शाळेतील शिक्षकांची उपस्थिती होती.     या भेटीदरम्यान त्यांनी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्याशी मुक्त संवाद साधत त्यातून त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. शिक्षक विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर शाळेतील एका विद्यार्थिनीने राखी पौर्णिमेचे औचित्य साधून जि. प. सदस्य डॉ. दिपक सोमवंशी यांना राखी बांधून आपल्या सण व संस्कृतीचे दर्शन घडवून दिले.मुक्त संवादानंतर डॉ. सोमवंशी यांनी जिल्हा परिषद शाळांना पुरेशा सुविधा उपलब्ध करून देवून दर्जेदार व गुणवतापूर्ण शिक्षण देण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगित...

*शिक्षण व सामाजिक कार्यातील अग्रेसर व्यक्तीमत्व : श्री. भूकेवाड डी. एन*

शिक्षण व सामाजिक कार्यातील अग्रेसर व्यक्तीमत्व : श्री. भूकेवाड डी. एन* ----------------------------------------     ध्येयाने प्रेरीत होवून कार्य करणारे अनेक मुख्याध्यापक शाळा आणि विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. विविध उपक्रम व योजना राबवत विद्यार्थी आणि शाळेचा विकास साधण्यात ते यशस्वी होत असतात. असेच एक मुख्याध्यापक श्री. भूकेवाड दत्तात्रय नारायणराव हे शिक्षण आणि सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. उत्कृष्ट अशी शैक्षणिक सेवा देत हजारो विद्यार्थी घडवून सेवेतून निवृत्त झाले. एक त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख....      श्री. भूकेवाड दत्तात्रय नारायणराव यांचा जन्म दि.१२ ऑगस्ट १९६६ रोजी सावरगांव ता.देवणी जि. लातूर येथे एका सामान्य शेतकरी कुटूंबात झाला, त्यांचे वडील निरक्षर शेतकरी पण आजी राधाबाई डोपेवाड यांच्या प्रेरणेने सर शिक्षणाकडे वळले. त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण जि.प. कें.प्रा. शाळा सावरगांव व उद्देश्वर विद्यालय सावरगांव येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्...

*आ. बस्वराजजी पाटील यांच्या पारिवारिक सत्काराचे आयोजन*

आ. बस्वराजजी पाटील यांच्या पारिवारिक सत्काराचे आयोजन*  ------------------------------------ उदगीर / प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री तथा विधान परिषद सदस्य आ. बस्वराजजी पाटील मुरूमकर यांच्या पारिवारिक सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.      या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री आ. संजयजी बनसोडे हे राहणार असून या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून औसाचे आ. अभिमन्यू पवार, मुरूमचे नगराध्यक्ष श्री. बापूरावजी पाटील, उमरगा जनता बँकेचे चेअरमन श्री. शरणजी पाटील व उदगीरच्या नगरध्यक्षा सौ. स्वाती हुडे यांची उपस्थिती राहणार आहे. सोमवारी दि. 10 ऑगस्ट रोजी सकाळी 11वा. येथील यशवंत दाल मिल, बिदर रोड या ठिकाणी संपन्न होणाऱ्या या पारिवारिक सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक श्री. दिगंबरराव यशवंतराव बिरादार माळेवाडीकर, मधुमेह तज्ञ तथा उदगीर नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक डॉ. बालाजी बिरादार, युवा उद्योजक श्री.दत्ता बिरादार यांनी केले आहे.

डोळस आणि चिंतनशील कवी : शंकर बोईनवाड

डोळस आणि चिंतनशील कवी : शंकर बोईनवाड ------------------‐-‐------------------ कवी आणि साहित्यिक हे समाजाचे जागृत डोळे असतात. आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने ते समाजातील भावना, विचार, संस्कृती आणि जीवनमूल्ये यांचे जतन करतात. त्यांच्या शब्दांतून माणसाच्या सुख-दुःखाचे, आशा-आकांक्षांचे आणि संघर्षांचे चित्र जिवंत होते. कवीच्या संवेदनशील मनाला निसर्ग, माणुसकी आणि जीवनातील विविध अनुभवांची सुंदर जाण असते. तो आपल्या कवितांमधून समाजाला विचार करायला लावतो, तर साहित्यिक आपल्या कथा, कादंबऱ्या, निबंध आणि लेखांच्या माध्यमातून समाजाला दिशा देतो. त्यांच्या साहित्यकृती केवळ मनोरंजन करत नाहीत, तर वाचकांच्या मनात संस्कार, प्रेरणा आणि सकारात्मक विचार मांडतात अशा नामावलीत शंकर बोईनवाड यांचे नाव अग्रक्रमावर घ्यावे लागेल. बोईनवाड हे केवळ एक व्यक्तिमत्त्व नसून स्वतंत्र विचारांची एक समृद्ध संस्कृती आहे. त्यांनी नायगावमध्ये साहित्याचे नवे आयाम निर्माण केले. विविध सांस्कृतिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेऊन नायगावच्या साहित्यिक वातावरणाला समृद्ध करण्यासाठी त्यांनी केलेले योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे. दैन...

महात्मा पब्लिक स्कूलची यशस्वी वाटचाल; दहाव्या वर्षात पदार्पण

महात्मा पब्लिक स्कूलची यशस्वी वाटचाल; दहाव्या वर्षात पदार्पण उदगीर : नाईक चौक, देगलूर रोड येथील ए-मार्टच्या शेजारी स्थित महात्मा पब्लिक स्कूलने यशस्वी शैक्षणिक वाटचालीची नऊ वर्षे पूर्ण करून आता दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळेने अल्पावधीतच पालकांचा विश्वास संपादन केला आहे. सन २०१७ मध्ये स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान, उदगीर अंतर्गत संचालक दीपक पाटील नेत्रगावे व सौ. संगीता नेत्रगावे यांनी महात्मा पब्लिक स्कूलची स्थापना केली. सुरुवातीला प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी व यूकेजीच्या अवघ्या ३० विद्यार्थ्यांसह आणि सहा शिक्षकांच्या सहकार्याने सुरू झालेली ही शाळा आज ११० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून सात शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकतेचे धडे दिले जातात. लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक विकास घडावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. नियमित अभ्यासक्रमासोबतच विविध स्पर्ध...