मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*गजानन भोपणीकरांनी शैक्षणिक क्रांतीसह राजकारणातही क्रांती केली - प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे*

अलीकडील पोस्ट

*बोरोळ जिल्हा परिषद गट काँग्रेसकडे *रतन पाटील नागराळकरांच्या नियोजनबद्ध प्रचाराला यश*

*बोरोळ जिल्हा परिषद गट काँग्रेसकडे *रतन पाटील नागराळकरांच्या नियोजनबद्ध प्रचाराला यश*  देवणी | प्रतिनिधी — सध्या पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बोरोळ जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार औदुंबर पांचाळ विजयी झाले आहेत. देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद जागांपैकी एक जागा काँग्रेसला मिळाल्याने राजकीयदृष्ट्या या निकालाकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे. या निकालामागे काँग्रेसचे तालुकास्तरावरील संयोजक रतन पाटील नागराळकर यांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार, संघटनात्मक बांधणी आणि सातत्यपूर्ण संपर्क हे महत्त्वाचे घटक ठरल्याचे पक्षांतर्गत सांगितले जात आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत रतन पाटील नागराळकर यांनी गटातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवले.रतन पाटील नागराळकर हे उदगीर पंचायत समितीचे पहिले सभापती स्व. मलशेट्टी आप्पा पाटील नागराळकर यांचे नातू असून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील नागराळकर यांचे पुतणे आहेत. सार्वजनिक जीवनाची पार्श्वभूमी असली, तरी या निवडणुकीत त्यांनी वैयक्तिक श्रेयापेक्षा...

*लातूर जिल्हा परिषदत जनमताचा संमिश्र कौल, काँग्रेसची झेप; भाजपाची घसरगुंडी! सत्तेच्या चाव्या अजित पवार गटाच्या हाती*

*लातूर जिल्हा परिषदत जनमताचा संमिश्र कौल, काँग्रेसची झेप; भाजपाची घसरगुंडी! सत्तेच्या चाव्या अजित पवार गटाच्या हाती* लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांचे निकाल जाहीर झाले असून, जिल्ह्याच्या राजकारणाने एका अत्यंत रंजक वळणावर प्रवेश केला आहे. या निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने जिल्ह्याच्या सत्तेचा पेच निर्माण झाला असला, तरी सत्तेची खरी सूत्रे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या हाती एकवटली आहेत. काँग्रेसने २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरून आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असला, तरी बहुमताचा ३० हा आकडा गाठण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे, गेल्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची १८ जागांवर झालेली घसरण हा या निकालाचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या निकालाचे सविस्तर विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, काँग्रेसने आपल्या जागांची संख्या १५ वरून २३ वर नेत मोठी मुसंडी मारली आहे. ग्रामीण भागात काँग्रेसची पकड अजूनही मजबूत असल्याचे या निकालाने सिद्ध केले आहे, मात्र विजयाचा गुलाल उधळण्यास...

गुरुकुलातील पाठशाळेच्या संस्कारक्षम अध्यापनाचा पवित्र वारसा प्रामाणिकपणे चालविणारा सच्चा शिक्षक : ज्ञानेश्वर बडगे

गुरुकुलातील पाठशाळेच्या संस्कारक्षम अध्यापनाचा पवित्र वारसा प्रामाणिकपणे चालविणारा सच्चा शिक्षक : ज्ञानेश्वर बडगे ---------------------------------------- " संता नाही कुळ याति!शिंपल्यापोटी जन्मे मोती! " या अनुभवजन्य स्वाभाविक संत वचनास स्वतःच्या कृती - युक्तीने सत्यता प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानेश्वर बडगे सरांचा जन्म दारिद्रय व अज्ञानाच्या चिखलात खोलवर रुतून -- फसून बसलेल्या , उपेक्षा व अपमानामुळे होणाऱ्या मानसिक वेदनेचे असह्य चटके सहन करीत जीवन जगत आलेल्या, गती - शक्ती व प्रगतीचा उत्साह हरवून बसलेल्या , असंख्य अडचणी व चिंतेच्या वर्तुळात - कोषल्यात कोषकिटकासम अडकलेल्या बहुजनातील सामान्य कुटुंबात उच्वर्णीयानी केवळ स्वार्थापोटी निर्माण केलेल्या हजारो जाती - पोटजातीतील संख्येनी अत्यल्प असलेल्या गोंधळी जातीत झाला. या जातीत जन्मलेले लोक लोकरंजनातून लोकांचे मनोबल वाढवून आयुष्यवृद्धी करणारा लोकरंजनाचा हा धंदा - व्यवसाय आपल्या व मुलाबाळांच्या पोटाला चटणी भाकर देणारी हक्काची वतनदारी समजून पिढ्यानपिढ्या करीत व मरत आले होते. बडगे सरांचे वडील उपजत तेजस्वी , चलाख बुध्दीचे होत...

*“गावासाठी झटणारं नेतृत्व हवं असेल तर हातात हात द्या – सुरेखा सोनकाबळे”*

*“गावासाठी झटणारं नेतृत्व हवं असेल तर हातात हात द्या – सुरेखा सोनकाबळे”* देवणी तालुक्यातील जवळगा पंचायत समिती गणामध्ये यंदाची निवडणूक ही केवळ पदासाठी नसून, विकास, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर होणारी निवडणूक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा यशवंत सोनकाबळे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या, शांत पण ठाम नेतृत्व म्हणून जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनत आहेत.काँग्रेस पक्षाची ओळख ही नेहमीच गोरगरीब, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहणारी राहिली आहे. हात हे निवडणूक चिन्ह केवळ एक चिन्ह नसून, तो आधार, मदत आणि विकासाचा हात आहे. याच विचारधारेतून सुरेखा सोनकाबळे या जवळगा गणात काम करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिलांचे प्रश्न यांची त्यांना प्रत्यक्ष जाणीव आहे. “गावापर्यंत विकासाची गंगा पोहोचवायची” ही त्यांची स्पष्ट भूमिका असून, प्रशासनाकडून होणारी दिरंगाई थांबवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा त्यांचा मानस आहे. महिलांना सक्षम करणे हेच खरे परिवर्तन असल्या...

*बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे धोंडराज किशनराव गुणालेची प्रचारात बाजी विरोधकांचे धाबे दणाणले - बालाजी सूर्यवंशी देवणीकर* .

*बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे धोंडराज किशनराव गुणालेची प्रचारात बाजी विरोधकांचे धाबे दणाणले - बालाजी सूर्यवंशी देवणीकर* . --------------------- *देवणी* तालुक्यातील बोरोळ जिला परिषद मतदार संघात भारतीय जनता पक्षाची मोठी लाट निर्माण झाली आहे धोंडराज गुणाले यांची विजयाकडे वाटचाल चालू आहे त्यामुळे विरोधकांचे धाबे दनाणाले आहेत असे मत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बालाजी सूर्यवंशी देवणीकर यांनी व्यक्त केले देवणी तालुक्यात सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आहेत भारतीय जनता पक्षाने कमळ चिन्हाच्या जोरावर गावोगावी पकड मजबूत केली असून, बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे अधिकृत उमेदवार धोंडराज किशनराव गुणाले हे प्रचारात स्पष्टपणे पुढे असल्याचे चित्र दिसत आहे. शेवटच्या टप्प्यात गुणाले यांनी घेतलेली मेहनत, सततचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची फौज आणि तालुक्यात झालेली विकासकामे यामुळे विरोधकांची धावपळ वाढली असून प्रचाराची दिशा पूर्णपणे भाजपच्या बाजूने वळली आहे. धोंडराज किशनराव गुणाले हे केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर कामातून ओळख निर्माण ...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...