मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

महात्मा पब्लिक स्कूलची यशस्वी वाटचाल; दहाव्या वर्षात पदार्पण

महात्मा पब्लिक स्कूलची यशस्वी वाटचाल; दहाव्या वर्षात पदार्पण उदगीर : नाईक चौक, देगलूर रोड येथील ए-मार्टच्या शेजारी स्थित महात्मा पब्लिक स्कूलने यशस्वी शैक्षणिक वाटचालीची नऊ वर्षे पूर्ण करून आता दहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमूल्ये आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळेने अल्पावधीतच पालकांचा विश्वास संपादन केला आहे. सन २०१७ मध्ये स्वामी विवेकानंद ग्रामसेवा प्रतिष्ठान, उदगीर अंतर्गत संचालक दीपक पाटील नेत्रगावे व सौ. संगीता नेत्रगावे यांनी महात्मा पब्लिक स्कूलची स्थापना केली. सुरुवातीला प्ले ग्रुप, नर्सरी, एलकेजी व यूकेजीच्या अवघ्या ३० विद्यार्थ्यांसह आणि सहा शिक्षकांच्या सहकार्याने सुरू झालेली ही शाळा आज ११० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असून सात शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच शिस्त, संस्कार, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मकतेचे धडे दिले जातात. लहान वयापासून विद्यार्थ्यांमध्ये बौद्धिक विकास घडावा यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. नियमित अभ्यासक्रमासोबतच विविध स्पर्ध...

*निळकंठ इंग्लिश स्कूलचे 11 व्या वर्षात यशस्वी पदार्पण*

*निळकंठ इंग्लिश स्कूलचे 11 व्या वर्षात यशस्वी पदार्पण* ---------------------------------------      उदगीर येथील भगीरथी मंगल कार्यालयाजवळ, डॅम रोड वर स्थित असलेले निळकंठ इंग्लिश स्कूल हे दहा वर्षे पूर्ण करून अकराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्रीमती नीलम्मा मेमोरियल शैक्षणिक संस्था संचलित निळकंठ इंग्लिश स्कूल ही नर्सरी ते आठवी पर्यंत चालणारी शाळा विविध गुणवता व विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास साधत आहे. या शाळेचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...        2016 मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. बस्वराज कंटय्या स्वामी आणि सचिव श्री. दिनेश शांतवीर स्वामी यांनी सुरुवातीच्या काळात श्री. माणिक तेलंग, संत कबीर नगर येथे निळकंठ इंग्लिश स्कूलची सुरुवात केली. शाळेच्या प्राचार्या सौ. जयश्री बस्वराज स्वामी यांचेही शाळेसाठी मोठे योगदान आहे. सुरुवातीच्या काळात 45 विद्यार्थी संख्येपासून सुरु झालेली ही शाळा आणि चार शिक्षक शिकवणीला होते. दहा वर्षामध्ये शाळेचा आलेख वाढत गेला आणि आजघडीला या शाळेत 300 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात तर त...

*न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि सामाजिक जाण व भान असणारे एक संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व : प्राचार्य एकनाथ पाटोदेकर*

*न्यायप्रिय, तत्वनिष्ठ आणि सामाजिक जाण व भान असणारे एक संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व : प्राचार्य एकनाथ पाटोदेकर* ---------------------------------------     माणसाच्या जीवनात त्याला वेळोवेळी संघर्ष करावा लागतो. दुःखाच्या, अडचणीच्या तसेच उणीवांच्या झळा सोसून देखील आपल्या विचाराशी व तत्वाशी कधीही तडजोड न करता संकटाशी दोन हात करण्याची जिद्द बाळगून जीवनात संघर्ष करावा लागतो. ही शिकवण अंगीकारूण, आपण नेहमीच इतराच्या कामी यावे. संकटकाळी, गरजेच्यावेळी इतरांसाठी धावून जावे. असा वसा घेवून जीवन जगणारी माणसं दुर्मिळच... काही माणसं अशीच भावना उराशी बाळगून जीवन जगत असतात. त्यापैकीच प्राचार्य एकनाथ पाटोदेकर हे एक नाव...        प्राचार्य एकनाथ दत्तराम पाटोदेकर हे माध्यमिक आश्रमशाळा व उच्च माध्यमिक विदयालय कुंटूर तांडा येथे जवळपास 32 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाले आहेत. धर्माबाद तालुक्यातील पाटोदा (थडी ) सारख्या लहानशा खेड्यात त्यांचा जन्म दि. 1 जून 1965 रोजी झाला.. गावातच प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी कुंडलवाडी येथे पायी येणे - जाणे कर...

*ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे : प्राचार्य मनोहर पवार*

*ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे : प्राचार्य मनोहर पवार* ----------------------------------------       सोमठाणा ता. नायगाव जि. नांदेड या छोट्याशा गावात अतिशय गरीब कुटुंबात सामाजिक अस्तित्व नाकारलेल्या समाजात जन्माला आलेले मनोहर पवार यांनी पराकोटीची जिद्द,चिकाटी व अपार मेहनतीच्या बळावर अगदी वयाच्या 24 व्या वर्षी आपल्या गावात अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शैक्षणिक संस्था सुरु करून शैक्षणिक चळवळ वाढीस नेली. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकून सवरून आपल्या पायावर उभी राहिली.ग्रामीण भागात शिक्षणाचा विस्तार करणारे प्राचार्य मनोहर पवार यांचा आज 62 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...        मनोहर कलावतीबाई पुंडलिकराव पवार यांचा जन्म दि. 1 जून 1964 रोजी सोमठाणा ता. नायगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असतानाही केवळ जिद्द चिकाटीने त्यांनी शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणा, माध्यमिक शिक्षण यशवंत हायस्कूल उमरी व महाविद्यालयीन शिक्षण नांदेड य...

*टी. एस. कल्लूरकर ( दादा ) एक* *आधारस्तंभ*

*टी. एस. कल्लूरकर ( दादा ) एक* *आधारस्तंभ*  --------------------------------------           बालाघाट पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या कल्लूर ता. उदगीर जि. लातूर येथील एका सामान्य कुटुंबातील पिता संग्रामबाबा व माता द्रौपदाबाई यांच्या पोटी दि. 01: 06: 1947 रोजी एक पुत्ररत्न जन्मास आले.त्या पुत्राचे नाव तुकाराम असे ठेवण्यात आले. वडिलांना बाबा तर आईला माय असे म्हणत असत. गाव लहान असल्याने कल्लूर येथे दुसरीपर्यंतच शाळा होती. तीही विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भरत असे. वडिलांचा सुतारकीचा व्यवसाय होता. म्हणून पंचक्रोशीत बाबांना संग्रामबाबा या नावानेच ओळखले जात असे. माय पहाटे लवकर उठून जात्यावर दळण दळत असे. माय ज्वारी दळत असताना स्वतःच रचलेल्या ओव्या म्हणत असे. मायने अनेक ओव्या रचलेल्या होत्या पण कोणीही या ओव्यांचा संग्रह करून ठेवले नाही. याची खंत प्रत्येकांना वाटते.अशा कठीण प्रसंगी त्यांनी आपल्या दोन मुलांना व एका मुलीला शिक्षण दिले. माय व बाबा अशिक्षित होते पण आपल्या मुलांनी खूप शिकून मोठी सरकारी नोकरी करावी असे वाटे. बाबा म्हणत, " तुला काय पाहिजे ते माग पण...

*किरण बापूरे यांच्या ‘दिलकश रुबाईयां’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन‘*

*किरण बापूरे यांच्या ‘दिलकश रुबाईयां’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन‘* उदगीर : येथील बिदर गेट परिसरातील हॉटेल आनंद येथे कवी हावगीराव उर्फ किरण बापूरे लिखित ‘दिलकश रुबाईयां’ या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आनंदी मॉर्निंग ग्रुप आणि जयवंतराव पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गट शिक्षण अधिकारी के. आर. शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शंकर बोईनवाड, जमहूर ज्युनियर कॉलेजचे प्रा. महेमूद अली जहागिरदार तसेच आनंदी गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष शरद कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी किरण बापूरे यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ कला शिक्षक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दिगंबर जाधव यांना “राज्य आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” जाहीर झाल्याबद्दल ग...

*शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूलचे यश*

*शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूलचे यश*  ---------------------------------------  उदगीर/ प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत निळकंठ इंग्लिश स्कूल, डॅम रोड उदगीर विद्यालयाचे प्रज्ञा स्वप्निल शृंगारे व मनुश्री उद्धव चामवाड ही विद्यार्थी पात्र ठरले आहेत. या  विद्यार्थ्यांना सहशिक्षक साधना बेंबळगे, दत्ता गुरदाळकर, शुभम उदगीरकर, प्रीती चिल्लरगे, नंदिनी वाडकर यांनी मार्गदर्शन केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्था अध्यक्ष प्रो. बसवराज स्वामी, मुख्याध्यापिका जयश्री बी. एस. यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले. या गुणवंताचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.