मुख्य सामग्रीवर वगळा

*निळकंठ इंग्लिश स्कूलचे 11 व्या वर्षात यशस्वी पदार्पण*

*निळकंठ इंग्लिश स्कूलचे 11 व्या वर्षात यशस्वी पदार्पण*
---------------------------------------
     उदगीर येथील भगीरथी मंगल कार्यालयाजवळ, डॅम रोड वर स्थित असलेले निळकंठ इंग्लिश स्कूल हे दहा वर्षे पूर्ण करून अकराव्या वर्षात पदार्पण करीत आहे. श्रीमती नीलम्मा मेमोरियल शैक्षणिक संस्था संचलित निळकंठ इंग्लिश स्कूल ही नर्सरी ते आठवी पर्यंत चालणारी शाळा विविध गुणवता व विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा परिपूर्ण विकास साधत आहे. या शाळेचा थोडक्यात आढावा घेणारा हा लेख...
       2016 मध्ये संस्थेचे अध्यक्ष श्री. बस्वराज कंटय्या स्वामी आणि सचिव श्री. दिनेश शांतवीर स्वामी यांनी सुरुवातीच्या काळात श्री. माणिक तेलंग, संत कबीर नगर येथे निळकंठ इंग्लिश स्कूलची सुरुवात केली. शाळेच्या प्राचार्या सौ. जयश्री बस्वराज स्वामी यांचेही शाळेसाठी मोठे योगदान आहे. सुरुवातीच्या काळात 45 विद्यार्थी संख्येपासून सुरु झालेली ही शाळा आणि चार शिक्षक शिकवणीला होते. दहा वर्षामध्ये शाळेचा आलेख वाढत गेला आणि आजघडीला या शाळेत 300 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात तर त्यांना 13 ते 15 शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात. या शाळेत शिस्तीचे, संस्काराचे व गुणवतेचे धडे दिले जातात. लहान वयापासूनच विद्यार्थी हा स्पर्धा परीक्षेत टिकावा यासाठी प्रयत्न केले जातात. अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षासाठी प्रोत्साहित केले जाते. जवाहर नवोदय परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा असेल यात विद्यार्थी घडविले जातात. परिणामी शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेचे तीन ते चार विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरतात.या शाळेच्या विद्यार्थ्यांनी ऑलंम्पियाडमध्ये भरारी मारली. या शाळेच्या 32 विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल मिळविले, एवढेच नाही तर या शाळेचा गणेश दंडे याने 25 हजार रू. चे पारितोषिक मिळविले. सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात या शाळेचे विद्यार्थी सांघिक व वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम आली. सार्वजनिक शिवजयंतीमध्ये या शाळेचे लेझीम पथक सहभागी होते.या शाळेमध्ये शिवजयंती, डॉ. आंबेडकर जयंती, म. फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, प. जवाहर नेहरू व इतर महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीचे आयोजन केले जाते व मान्यवरांना पाचरण करून त्या त्या महापुरुषाच्या जीवनावर प्रकाश टाकले जाते. शाळा प्रवेश, वाचन प्रेरणादिन, गोकुळाष्टमी, मकर संक्रात, गुडी पाडवा, दसरा, रमजान ईद, धुलिवंदन, गुरुपौर्णिमा, शिक्षक दिन, महाराष्ट्र दिन, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 17 सप्टेंबर साजरे केले जातात. या शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले जाते. नृत्य, गीत गायन, वक्तृत्व, नाटीका आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव दिला जातो. शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेच्या वतीने साजरा केला जातो.वेगवेगळ्या दिनाचे औचित्य साधून क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाते. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन केले जाते. या शाळेच्या वतीने शहरातील साहित्यिक व कविना पाचरण करून भव्य असे कवी संमेलन घेतले जाते. दरमहिन्याला पालक मेळाव्याचे आयोजन करून पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या गुणवतेचा अहवाल पालकांना सादर करून त्याची प्रगती कशी साधता येईल यासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थी हे सारखेच अभ्यासात गुंतून न राहता थोडा विसावा म्हणुन शैक्षणिक सहलीचे आयोजन केले जाते. या शाळेच्या आतापर्यंत अकलूज, बिदर, चाकूर, साईधाम, हत्तीबेट, शिवम रिसॉर्ट, राजराजेश्वरी मंदिर येथे सहली काढण्यात आल्या. या शाळेत विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे माजी मंत्री आ. संजय बनसोडे, नगराध्यक्षा सौ. स्वाती सचिन हुडे, नगरसेवक व शिक्षण विभागातील अधिकारी यांनी भेटी दिल्या आणि विद्यार्थ्याचे कौतुक केले. भविष्यात निडेबन येथे 7 एकर जागेमध्ये भव्य असे शैक्षणिक संकुल सुरुवात करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष बस्वराज स्वामी यांनी बोलून दाखवला. संस्थेचे अध्यक्ष बस्वराज स्वामी व सचिव दिनेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या प्राचार्या सौ. जयश्री स्वामी व त्यांचे सहकारी शिक्षिका सुमित्रा जाधव, सुरेखा देवणीकर, शीतल शिवणखेडे, साधना बेंबळगे, नम्रता बिरादार, नंदिनी वाडकर, नंदिनी हिवरे, प्रीती चिल्लर्गे, शुभम उदगीरकर, दत्ता गुरदाळकर, मेघा कारभारी, संजीवकुमार स्वामी आदी शाळेच्या, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नरत आहेत. भविष्यात शाळेच्या वाटचालीस शुभेच्छा देऊया!

         *शंकरबोईनवाड,उदगीर*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...