मुख्य सामग्रीवर वगळा

*एक सेवाभावी व्यक्तिमत्व : गोपाळराव कांबळे*

*एक सेवाभावी व्यक्तिमत्व : गोपाळराव कांबळे*
------------------------------------
     सेवाभावी वृतीने आयुष्यभर विद्यार्थी घडवीणारे, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षण देणारे सेवाभावी व्यक्तिमत्व म्हणजे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. गोपाळराव कांबळे हे होत. आज शिक्षक दिन त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
         श्री गोपाळराव मरेप्पा कांबळे यांचा जन्म दि.2० जानेवारी १६६३ रोजी लखनगाव ता. भालकी जि. बिदर येथे एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक ते माध्यमिक पर्यंतचे शिक्षण जि. प. हायस्कूल लखनगाव, उच्च माध्यमिक शिक्षण शिवाजी महाविद्यालय उदगीर, अध्यापन पदविका मराठी बी. टी. आय. बिदर येथून पूर्ण केली., पदवी व पदव्युत्तर शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे बहिस्थ पध्दतीने घेतले.बी.एड.व एम.एड.चे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, येथुन घेतले. एम. ए. राज्यशास्त्र ही पदवीही त्यांनी प्राप्त केली.श्री. कांबळे सर हे १२ वी ला असताना पाच वेळा नापास झाले पण शिक्षणाची जिद्द सोडली नाही. प्रारंभी ते अध्यापन पदविका पास झाल्यावर दि. ११ जून १६८३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय उदगीर येथे रुजू झाले. त्यानंतर ते या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले अलीकडेच ते सेवेतून निवृत्त झाले. शाळा ही त्याकाळी विनाअनुदानित असल्यामुळे सरांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यानंतर त्यांनी शासनाने लावून दिलेल्या सर्व कार्यक्रम व उपक्रमाची अंमलबजावणी करून शैक्षणिक गुणवतेत शाळा आघाडीवर नेली. शाळाबाह्य मुलांना स्वखर्चाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करून शाळेच्या प्रवाहात आणले. शिष्यवृत्ती, नवोदय व इतर स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी
घडविले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले. मान्यवरांना शाळेत बोलावून त्यांचे विचार ऐकवले. २००५ मध्ये उदगीर शहरातील भटक्या विमुक्तांच्या जवळपास ४३ विद्यार्थ्यांना त्या त्या ठिकाणाहून वाजत गाजत शाळेत आणून प्रवेश दिला. त्यासाठी प्रथम त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. त्या ४३ पैकी २२ विद्यार्थी शिक्षण घेण्यात यशस्वी झाले. काहींनी व्यवसाय थाटला.भटक्या विमुक्त लोकांना महात्मा फुले महामंडळाकडून कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले याकामी नगरसेवक अनिल मुदाळे व सामाजिक कार्यकर्ते धनाजी बनसोडे यांचे सहकार्य मिळाले.. पाणी फाउंडेशन व वृक्षलागवडी मध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. सरांनी विविध संघटनेत महत्वपूर्ण कार्य केले.
       श्री. गोपाळराव कांबळे यांच्या कार्याची दखल घेऊन अनेक संस्थांनी त्यांचा सन्मान केला. प्राचार्य डॉ. ना. य. डोळे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, मुख्याध्यापक
फोरमचा उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार, जिल्हास्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार, मदत संघटना नागपूरचा समाज भूषण पुरस्कार, एकता सेवाभावी संस्था परभणी चा पुरस्कार, साने गुरुजी नांदेड कथामालेचा पुरस्कार असे अनेक सन्मान त्यांच्या नावे आहेत. सरांचे विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत. सरांनी विद्यार्थी घडवीत असताना आपल्या कुटुंबाकडेही विशेष लक्ष दिले. त्यांचा मुलगा सुमेर कांबळे हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे.तर स्नुषा दीपाली सुमेर कांबळे हया सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. व मुलगी प्रिती कांबळे ही एम.डी. आहे. पत्नी सौ. शोभाताई नेत्रगावकर हया लालबहादूर शास्त्री विद्यालय उदगीर येथे शिक्षिका आहेत. श्री. गोपाळराव कांबळे गुरुजींचे शैक्षणिक कार्य हे इतरांना प्रेरणदायीच आहे. आज शिक्षक दिनानिमित्त त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देवूया !

     *शंकर बोईनवाड*
     पत्रकार, उदगीर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.*

*जनतेच्या मनात स्थान मिळवलेले लोकसेवक — राम नरसिंग बिरादार चवणहिप्परगेकर.* देवणी तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे नाव म्हणजे राम नरसिंग बिरादार चवण चवणहिप्परगेकर. विकासाची गती वाढविणे, समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळवून देणे आणि प्रत्येक घरापर्यंत प्रगतीचे किरण पोहोचवणे हा त्यांचा जीवनधर्म आहे.राम नरसिंग बिरादार हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी आणि सेवाभावी व्यक्तिमत्व आहेत.रास्त भाव दुकानाचे चेअरमन म्हणून त्यांनी शेकडो गरीब कुटुंबांपर्यंत परवडणाऱ्या दरात अन्नधान्य पोहोचवले.कै. गंगाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव म्हणून समाजातील वंचित, दिव्यांग, विधवा आणि गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवले. त्यांची साई इंग्लिश स्कूल, चवणहिप्परगा ही संस्था ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणारी अग्रगण्य शाळा आहे. गावातील गरिब, शेतकरी आणि मजूर वर्गातील विद्यार्थ्यांना ते मोफत प्रवेश देतात, शैक्षणिक साहित्य आणि गणवेश स्वतःच्या खर्चाने देतात.“कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये” ही त्यांची भूमिका अस...