*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर*
देवणी तालुक्यातील प्रशासनात अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गटविकास अधिकारी सागर सुरेश वरंडेकर हे नाव आज सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहे. कार्यतत्परता, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि संवेदनशीलतेच्या बळावर त्यांनी प्रशासनाला गतिमान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील पळसंबे या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सागर वरंडेकर यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत 2021 मध्ये MPSC नागरी सेवेतून गटविकास अधिकारी पद मिळवले. स्पर्धा परीक्षेच्या काळात त्यांच्या कुटुंबाचा विशेषतः लहान भावाचा मिळालेला पाठिंबा त्यांच्या यशामागे महत्त्वाचा ठरला. कार्यक्षेत्रात आल्यानंतर त्यांनी “संवाद आणि समन्वय” या सूत्रावर भर देत प्रशासनात काम करण्याची नवी दिशा दिली. कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून काम करून घेणे आणि जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची खास शैली ठरली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय कामे झाली. जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाला मुख्यमंत्री 100 दिवस कार्यक्रमात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. संत गाडगेबाबा अभियानात नागतीर्थवाडीने जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले. कार्यालयाचे सुशोभीकरण करून नागरिकांसाठी अधिक सुसज्ज वातावरण तयार करण्यात आले. तालुक्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलतरा प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी पातळी वाढवण्यावर त्यांनी भर दिला. मुख्यमंत्री पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींसाठी वेबसाइट तयार करण्याचा उपक्रम राबवून डिजिटल प्रशासनाची पायाभरणी केली. तसेच कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सुरू करून कामकाज अधिक पारदर्शक व गतिमान केले. नागरिकांच्या सोयीसाठी RO फिल्टर, तक्रार पेटी बसविणे आणि सभागृहाचे नूतनीकरण यांसारखे उपक्रम राबविले. नवकल्पनांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचारी, शिक्षक आणि ग्रामसेवकांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याची संकल्पना त्यांनी राबविली. दिव्यांग व्यक्तींना स्वखर्चातून शिलाई मशीन देऊन सामाजिक बांधिलकी जपली. तालुक्यातील 45 पैकी 24 गावांमध्ये ग्रामदरबार आयोजित करून प्रशासन थेट जनतेपर्यंत नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामुळे नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याला चालना मिळाली. त्यांच्या कार्याची दखल घेत मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. तसेच संत गाडगेबाबा अभियानातही तालुक्याने जिल्ह्यात अव्वल स्थान मिळवले. व्यक्तिगत जीवनात साधेपणा जपणारे वरंडेकर यांच्या पत्नीही शासकीय सेवेत कार्यरत आहे. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांना कामात अधिक ऊर्जा मिळत असल्याचे सहकाऱ्यांचे मत आहे.त्यांच्या कार्यशैलीतील सर्वात वेगळेपण म्हणजे मानवी स्पर्श. कार्यालयात एखादा नागरिक जास्त वेळ थांबलेला दिसला तर स्वतः बोलावून घेऊन त्याची अडचण जाणून घेणे, तरुणांना शिक्षणाबाबत मार्गदर्शन करणे, गरजूंना छोटीमोठी मदत करणे – या गोष्टींमुळे ते जनतेच्या अधिक जवळ गेले आहेत. “लोकांचे लोकांसाठी प्रशासन” ही त्यांची कार्यदृष्टी असून भविष्यात देवणी तालुक्याचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी जलसंधारण प्रकल्पांवर भर देण्याचा त्यांचा मानस आहे.
आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून,
“अधिकारी असावा तर सागर वरंडेकरांसारखा” अशी भावना जनमानसात व्यक्त होत आहे.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा