मुख्य सामग्रीवर वगळा

*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर

*नागराळ येथे श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा ऐतिहासिक सोहळा**श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते भूमिपूजन; हजारोंच्या साक्षीने धर्मसंस्कृतीचा जागर*

*नागराळ येथे श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा ऐतिहासिक सोहळा*
*श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते भूमिपूजन; हजारोंच्या साक्षीने धर्मसंस्कृतीचा जागर*

देवणी : देवणी तालुक्यातील नागराळ येथील प्राचीन व ऐतिहासिक श्री गुरुलिंगेश्वर मठ संस्थान येथे मठाच्या जिर्णोद्धार व नव्या बांधकामाचा भव्य धार्मिक सोहळा सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. उज्जैनी महापीठाचे परमपूज्य श्री श्री श्री १००८ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते मठाच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्यास नागराळ गावासह देवणी तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक गावांमधून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.नागराळ येथील गुरुलिंगेश्वर मठाला तब्बल ७५ वर्षांनंतर मठाधीश लाभल्याचा ऐतिहासिक क्षण या सोहळ्यामुळे साकार झाला. नागराळ येथील मठाधीश म्हणून श्री म. नि. प्र. सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या रूपाने गुरुपरंपरेचा नवा अध्याय सुरू झाला असून हा क्षण नागराळ गावासाठी अभिमानाचा मानला जात आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी पारंपरिक वेदघोष, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींसह भूमिपूजनाने झाली. त्यानंतर आयोजित धर्मसभेत विविध संत-महंत, शिवाचार्य महाराज व धर्मगुरूंनी धर्म, संस्कृती, गुरू परंपरा आणि समाजजीवनातील आध्यात्मिक मूल्यांवर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी संचलन प्रा. रेवण मळभागे यांनी केले, तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक बसवराज पाटील नागराळकर यांनी करून मठाच्या इतिहासाची माहिती दिली.यावेळी बोलताना बसवराज पाटील नागराळकर यांनी सर्व धर्म समभावाची परंपरा जपत नागराळ गावातील सर्व समाज बांधवांच्या सहकार्याने हा भव्य धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी गावातील ऐक्य, बंधुता आणि सामाजिक सलोखा यांचा उल्लेख करत हा कार्यक्रम संपूर्ण गावाच्या सहभागातून यशस्वी झाल्याचे नमूद केले.
या वेळी त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले की, नागराळ मठाच्या जिर्णोद्धाराचा हा ऐतिहासिक सोहळा पाहण्याचे स्वप्न अनेक ज्येष्ठांनी पाहिले होते. मात्र या क्षणी आपल्या वडिलांची उपस्थिती नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी ऋषितुल्य स्व. मलशेट्टी आप्पा पाटील यांची आठवण काढली. “आज हा भव्य सोहळा पाहून ते नक्कीच आनंदित झाले असते,” असे सांगताना त्यांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले.धर्मसभेत बोलताना अनेक संत-महंतांनी गुरू परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. सोनपेठ येथील नंदकिशोर महाराज यांनी सांगितले की, “धर्माचे पालन केले तर जीवनातील सर्व सुख प्राप्त होते. समाजात धर्म वाढवायचा असेल तर मठ आणि धार्मिक संस्था मजबूत केल्या पाहिजेत.”
उदगीर येथील शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “जगात गुरूपेक्षा मोठे स्थान दुसरे नाही. परमेश्वराशी जोडणारा सर्वात मोठा मार्ग म्हणजे गुरू होय.”या प्रसंगी श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी आपल्या प्रभावी भाषणातून धर्म, गुरूपरंपरा आणि निसर्ग यांचे महत्त्व स्पष्ट केले. ते म्हणाले की, “वेळ येणे अत्यंत महत्त्वाचे असते. नागराळ मठाला तब्बल ७५ वर्षांनंतर मठाधीश लाभले हा अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक क्षण आहे.”
आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य सांगताना धर्माला आईचा दर्जा दिला जातो असे सांगितले. विज्ञान आणि निसर्ग यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “विज्ञान कितीही प्रगत झाले तरी धरती मातेसमोर ते लहानच आहे. विज्ञान एका बीजाचे अनेक बीज तयार करू शकत नाही, परंतु धरती माता एका बीजापासून असंख्य बीज निर्माण करते.”
तसेच त्यांनी गोमातेचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व अधोरेखित करत भारतीय संस्कृतीतील निसर्गपूजेची परंपरा समजावून सांगितली. समाजाने एकत्र येऊन धर्मसंस्कृती जपावी, असा संदेशही त्यांनी दिला.या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून डॉ. शंभुलिंग शिवाचार्य महाराज उपस्थित होते. तसेच नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, अमृतेश्वर शिवाचार्य महाराज यांच्यासह अनेक संत-महंत व धर्मगुरूंची उपस्थिती लाभली. सोहळ्याच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी आयोजित शिवकिर्तन कार्यक्रमाला भाविकांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रसिद्ध कीर्तनकार शिवशरण गुरूजी रटकलकर यांनी केलेल्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले. तसेच परिसरातील विविध गावांतील भजनी मंडळांनीही सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंदन पाटील नागराळकर यांनी केले.
नागराळ येथील श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा हा सोहळा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून गुरूपरंपरेचा जागर, सर्व धर्म समभावाचा संदेश आणि नागराळ गावाच्या एकतेचे प्रतीक ठरला असल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...