मुख्य सामग्रीवर वगळा

*किरण बापूरे यांच्या ‘दिलकश रुबाईयां’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन‘*

*किरण बापूरे यांच्या ‘दिलकश रुबाईयां’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन‘*
उदगीर :
येथील बिदर गेट परिसरातील हॉटेल आनंद येथे कवी हावगीराव उर्फ किरण बापूरे लिखित ‘दिलकश रुबाईयां’ या हिंदी काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आनंदी मॉर्निंग ग्रुप आणि जयवंतराव पाटील ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यास साहित्य, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गट शिक्षण अधिकारी के. आर. शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. अनिल भिकाने, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक शंकर बोईनवाड, जमहूर ज्युनियर कॉलेजचे प्रा. महेमूद अली जहागिरदार तसेच आनंदी गुड मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष शरद कुलकर्णी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कवी किरण बापूरे यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच ज्येष्ठ कला शिक्षक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्रीधर दिगंबर जाधव यांना “राज्य आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६” जाहीर झाल्याबद्दल गौरविण्यात आले. बारावी परीक्षेत ९८ टक्के गुण आणि जेईई परीक्षेत ९९.५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी अलोक अनिल मालू याचाही विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. महेमूद अली जहागिरदार यांनी ‘दिलकश रुबाईयां’ या काव्यसंग्रहावर अभ्यासपूर्ण व मार्मिक समीक्षा सादर केली. कवी किरण बापूरे यांनी आपल्या रुबायांमधून मानवी भावना, प्रेम, सामाजिक वास्तव आणि समकालीन विषयांचे प्रभावी चित्रण केल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे डॉ. अनिल भिकाने यांनी कवी किरण यांच्या साहित्यिक कार्याचे कौतुक करताना, “त्यांचे लेखन समाजाला विचारप्रवृत्त करणारे असून नशिबापेक्षा कर्तृत्वावर विश्वास ठेवण्याचा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे आहे,” असे प्रतिपादन केले.
कवी किरण बापूरे यांनी मनोगतातून या काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागील भावविश्व आणि साहित्यप्रवास उलगडून सांगितला. त्यांनी सर्व आयोजक, साहित्यप्रेमी आणि उपस्थितांचे आभार मानले. यावेळी श्रीधर जाधव व माधवराव फावडे यांनीही मनोगत व्यक्त केले. शरद कुलकर्णी यांनी “प्रेमात डोळस माणूसही आंधळा होतो,” अशी मिश्किल टिप्पणी करत उपस्थितांची दाद मिळवली.
अध्यक्षीय समारोपात के. आर. शिंदे यांनी ‘दिलकश रुबाईयां’ हा उत्कृष्ट काव्यसंग्रह असून साहित्यप्रेमींनी तो आवर्जून वाचावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव मुरलीधर जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन रमेश कोरे यांनी मानले.
या सोहळ्यास अनिल पत्तेवार, मिर्झा वहीदली, झुंगा स्वामी, राम विलास नावंदर, अमृतराव पाटील, माणिकराव शिंदे, विश्वनाथराव बिरादार, विश्वनाथराव मुडपे, रमाकांत बनशेळकीकर, प्राचार्य विजयकुमार पाटील, बाबुराव माशाळकर, प्रा रमाकांत मध्वरे, दीपक बलसुरकर, लहूदास याचावाड, हकिमसाहेब , व्यंकटराव बिरादार, विष्णू लोया, रमेश गोरे, शेषराव इंगोले, प्रकाश बिरादार, रंगराव मोरे , बंडू बेद्रे, अब्दुल हकिम, गणपतराव नकाते यांचे सह जयवंतराव पाटील मित्र मंडळ,आनंदी गुड मॉर्निंग ग्रुप, जिव्हाळा ग्रुप, अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, साहित्यिक, पत्रकार, वाचक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नेटकेपणाने करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...