मुख्य सामग्रीवर वगळा

*“गावासाठी झटणारं नेतृत्व हवं असेल तर हातात हात द्या – सुरेखा सोनकाबळे”*

*तळेगाव पंचायत समिती गणात प्रणिता रोहित चामले यांचा विजय निश्चित – युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर*

*तळेगाव पंचायत समिती गणात प्रणिता रोहित चामले यांचा विजय निश्चित – युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर*
  
तळेगाव पंचायत समिती मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिता रोहित चामले यांनी प्रचाराच्या आघाडीवर स्पष्ट वर्चस्व मिळवले असून, त्यांचा विजय निश्चित असल्याचे मत राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असणारे भास्कर चामले यांच्या त्या सुनबाई असून, प्रणिता चामले यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या त्यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून, प्रत्येक गावात, प्रत्येक घटकात त्या थेट संवाद साधत आहेत. या प्रचाराची संपूर्ण धुरा युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर समर्थपणे सांभाळत आहेत.
मतदारांची मानसिकता ओळखून, विकासाची स्पष्ट दिशा समोर ठेवत, विविध शासकीय योजना व लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याचा सुस्पष्ट आराखडा प्रणिता चामले मतदारांसमोर मांडत आहेत. त्यामुळे इतर उमेदवारांच्या तुलनेत त्या अधिक सक्षम व योग्य उमेदवार असल्याचे मतदारांमध्ये ठामपणे उमटत आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा, गोरगरिबांचा आणि वंचितांचा पक्ष असून, विकासाची व्यापक दृष्टी असलेला पक्ष आहे, हे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रचारादरम्यान प्रभावीपणे सुरू आहे. “प्रणिता रोहित चामले यांना प्रचंड मतांनी विजयी करा,” असे आवाहन रतन अण्णा पाटील नागराळकर सातत्याने करत आहेत. रोहित चामले यांचे देवणी तालुक्याच्या सामाजिक व विकासात्मक जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे. सामाजिक व राजकीय दृष्टिकोनातून पाहता त्या सर्वांपेक्षा सरस उमेदवार त्यांच्या पत्नी ठरत आहेत. सर्वसामान्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे, लोकांच्या अडचणी आपल्याच समजून मोठ्या मनाने सहकार्य करणे, हीच चामले परिवाराची ओळख आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून ही बांधिलकी सातत्याने जोपासली जात आहे.
राजकीय वारसा नसतानाही, अल्पावधीत जनतेच्या विश्वासावर उभे राहिलेले नाव म्हणजे प्रणिता रोहित चामले. तरुण, उच्चशिक्षित आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्या पुढे येत असून, काहीच दिवसांत त्या तळेगाव गणात अग्रभागी ठरल्या आहेत.
“काँग्रेस पक्षाने ७० वर्षे सत्तेत असताना गोरगरीब जनतेच्या विकासासाठी काम केले आहे. पुढील काळातही तोच विकासाचा वारसा पुढे नेण्याचा आमचा निर्धार आहे. जिल्ह्यात बदल झाला, नगरपरिषदेत बदल झाला, तर पंचायत समितीतही बदल घडवून आणू,” असा विश्वास प्रचारादरम्यान व्यक्त केला जात आहे. देवणी तालुका आज स्पष्टपणे बोलतो आहे  “काँग्रेसचा हात म्हणजे मदतीचा हात.”
हा हात सर्वसामान्यांसाठी, शेतकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी सदैव पुढे राहील, असा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.
त्यामुळे तळेगाव पंचायत समिती गणात प्रणिता रोहित चामले यांचा विजय अटळ असल्याचा विश्वास काँग्रेस कार्यकर्ते व समर्थक व्यक्त करत असून, मतदारांनी बहुमूल्य मतदान करून त्यांच्या विजयाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
 *दयानंद कांबळे नागराळकर
7887827886

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर*

*विद्रोही साहित्यातील सावित्री!डॉ.प्राजक्ताताई पांडुरंग कलंबरकर* ----------------------- *देवणी* : उपासपोटी संघर्षातून क्रांती व विद्रोह निर्माण होत असतो सोसलं भोगलं व अनुभवलं यातून क्रांतीची ज्वाला निर्माण होऊन बाहेर पडतात परंतु प्राजक्ताताईला कसल्याही गरिबी दारिद्र्याच्या झळा सोसाव्या लागल्या नाही समाजाच्या व्यथा वेदना पाहून प्राजक्ताताच्या शब्दा शब्दात मात्र विद्रोह दिसून येतो प्राजक्ता चे वडील पांडुरंग कलंबरकर हे वैद्यकीय अधिकारी परंतु घरात फुले शाहू आंबेडकर विचाराचे विद्रोही वातावरण त्यातून विद्रोही साहित्य निर्मिती होणं सहाजिक आहे मात्र  एम. बी. बी.एसचं वैद्यकीय उच्च शिक्षण घेता घेता अभ्यासाचा एवढा व्याप असताना विद्रोही साहित्याची निर्मिती डॉ प्राजक्ता कलंबरकरताई यांच्या हातून  विद्रोही साहित्याची निर्मिती होणं त्या साहित्याची दखल विदेशातील नामांकित फेम टाइम्स या मीडियाने दाखल घेऊन 2025 मधील सर्वात प्रेरणादायी तरुणी लेखिका म्हणून  जागतिक महिलांचा बरोबरी करणारा[Most Inspring young Woman Author Of The Year 2025] हा पुरस्कार तिला बहाल करणं म्हणजे डॉ बाबासाह...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले*

*दावनगाव गणातून सर्वसामान्यांची उमेदवार म्हणून पुढे आलेल्या – सौ. कोमल कमलाकर फुले* दावनगाव गण पंचायत समिती निवडणुकीत सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून पुढे आल्या आहेत. साधी, सुज्ञ आणि तळागाळाशी जोडलेली असल्यामुळे त्यांचा लोकांत वेगळाच ओढा निर्माण झाला आहे. सौ. कोमल फुले यांनी अल्पावधीतच गावोगाव फिरत महिलांशी, शेतकऱ्यांशी, तरुणांशी थेट संवाद साधायला सुरुवात केली आहे. शासकीय योजनांची माहिती देणे, विधवा, निराधार, श्रमिक, दिव्यांग आणि शेतकरी कुटुंबांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यावर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची त्यांची धडपड लोक अनुभवत आहेत. त्यांचे पती कमलाकर बालाजीराव फुले हे अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत. तरुणांना एकत्र करून त्यांना योग्य सल्ला देणे, कोणताही कार्यक्रम असो वा एखाद्या कुटुंबाची अडचण असो “सगळ्यात आधी धावून जाणारे” नाव म्हणजे कमलाकर फुले, अशी ओळख स्थानिक पातळीवर तयार झाली आहे.कमलाकर फुले यांना कोणताही राजकीय वारसा लाभला नसला, तरी त्यांच्या कुटुंबाची समाजसेवेची परंपरा मजबूत आह...