विलासराव देशमुखांच्या विकासविचारांचा वारसा पुढे नेत बोरोळमध्ये काँग्रेसचा सामान्य माणूस मैदानात* *““सामान्य माणसाला ताकद देणारी उमेदवारी – बोरोळमध्ये औदुंबर पांचाळसह काँग्रेसचा ठाम निर्धार””*
*विलासराव देशमुखांच्या विकासविचारांचा वारसा पुढे नेत बोरोळमध्ये काँग्रेसचा सामान्य माणूस मैदानात*
*““सामान्य माणसाला ताकद देणारी उमेदवारी – बोरोळमध्ये औदुंबर पांचाळसह काँग्रेसचा ठाम निर्धार””*
----------------------
*बोरोळ* (ता. देवणी)
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, गोरगरिबांच्या प्रश्नांना प्राधान्य आणि प्रशासनात पारदर्शकता या मूल्यांवर आधारित राजकारणाची परंपरा स्व. विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्रात निर्माण केली. त्याच विचारधारेतून बोरोळ जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाने सामान्य, शिक्षित आणि लोकांमध्ये वावरणारे औदुंबर पांचाळ यांना उमेदवारी दिली असून मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
औदुंबर पांचाळ हे जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे यांचे निकटवर्तीय सहकारी म्हणून ओळखले जातात. संघटनात्मक कामाचा अनुभव, पक्षाशी निष्ठा आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क यामुळे ते काँग्रेस पक्षातील विश्वासार्ह चेहरा मानले जातात. जिल्हा पातळीवरील नेतृत्वाचा पाठिंबा लाभल्यामुळे बोरोळ मतदारसंघात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत होत असल्याचे चित्र आहे. औदुंबर पांचाळ यांची ओळख केवळ राजकारणापुरती मर्यादित नसून, समाजकारणाला केंद्रस्थानी ठेवणारे कार्यकर्ते म्हणून आहे. शासनाच्या विविध योजना गोरगरिबांपर्यंत कशा पोहोचवता येतील, याचे प्रशासकीय ज्ञान आणि अनुभव त्यांच्याकडे आहे. पैशाच्या जोरावर नव्हे, तर लोकांच्या विश्वासावर आणि कामाच्या आधारे निवडणूक लढवणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
गाव स्वच्छतेसाठी त्यांनी घेतलेला गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्काराचा संकल्प आजही लोकांच्या स्मरणात आहे. जोपर्यंत गाव हागणदारीमुक्त होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालण्याचा निर्णय त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. त्यामुळे औदुंबर पांचाळ हे केवळ आश्वासन देणारे नव्हे, तर कामातून उदाहरण देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात.
शिक्षण, अंगणवाडी, दलित वस्ती विकास, स्मशानभूमी, रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेऊन विकासाची स्पष्ट दिशा देणारा उमेदवार म्हणून मतदार त्यांच्याकडे पाहत आहेत.
स्व. विलासराव देशमुख यांच्या विकासविचारांची परंपरा पुढे नेत माजी मंत्री अमितभैय्या देशमुख आणि युवानेते धीरज देशमुख यांनी ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवत उमेदवार दिल्याची भावना मतदारांमध्ये आहे.
बोरोळ मतदारसंघात औदुंबर पांचाळ यांच्या प्रचाराचे नेतृत्व युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर करत असून नियोजनबद्ध प्रचार, स्थानिक प्रश्नांवर आधारित भूमिका आणि काँग्रेस पक्षाची विकासात्मक दृष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. “सामान्य माणसाचा आवाज जिल्हा परिषदेत पोहोचवण्यासाठी औदुंबर पांचाळ हे योग्य उमेदवार आहेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.आज बोरोळ जिल्हा परिषद मतदारसंघात काँग्रेस पक्षाबाबत सहानुभूतीचे वातावरण दिसून येत असून, औदुंबर पांचाळ यांना गावोगावी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साधेपणा, संघटनात्मक ताकद आणि लोकांशी थेट संवाद यामुळे काँग्रेसचा गड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा