*“खुर्चीपेक्षा माणूस मोठा असतो” – अक्का फाउंडेशनच्या सेवेतून जनतेचा विश्वास जिंकणारे भाजपचे लोकाभिमुख नेतृत्व रामलिंग शेषराव शेरे*
*“खुर्चीपेक्षा माणूस मोठा असतो” – अक्का फाउंडेशनच्या सेवेतून जनतेचा विश्वास जिंकणारे भाजपचे लोकाभिमुख नेतृत्व रामलिंग शेषराव शेरे*
----------------------
*देवणी* :राजकारणात अनेक चेहरे येतात-जातात; परंतु सेवेच्या माध्यमातून जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करणारे नेतृत्व फारच कमी असते. जवळगा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामलिंग शेषराव शेरे हे असेच एक लोकाभिमुख, सेवाभावी आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जवळगा गटात विकासाभिमुख आणि विश्वासार्ह उमेदवार दिला असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.
रामलिंग शेरे यांची ओळख केवळ राजकीय कार्यकर्ते म्हणून मर्यादित नाही. अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गरजू, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठे कार्य उभे केले आहे. या फाउंडेशनमार्फत आजपर्यंत हजारो गरीब रुग्णांवर मोफत उपचार, विविध गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, औषध वाटप, महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन, तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत देण्यात आली आहे. उपचारासाठी शहरात जाणे शक्य नसलेल्या अनेक कुटुंबांसाठी ही मदत अक्षरशः जीवनदायी ठरली आहे.
आरोग्य हा मूलभूत हक्क आहे, ही भूमिका प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देत रामलिंग शेरे यांनी सेवाभाव हेच खरे राजकारण असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळेच ते समाजात वावरताना केवळ नेता म्हणून नव्हे, तर आपुलकीने मदतीला धावून येणारा माणूस म्हणून ओळखले जातात.
ग्रामपातळीवर उपसरपंच म्हणून जबाबदारी सांभाळताना रामलिंग शेरे यांनी अनेक शासकीय योजना प्रभावीपणे राबवल्या. पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रधानमंत्री आवास योजना, शौचालय योजना, रस्ते, वीज, तसेच विविध सामाजिक योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. कागदोपत्री कामांपेक्षा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यावर त्यांचा भर राहिला. याच काळात त्यांनी प्रशासनाशी समन्वय ठेवून कामे मार्गी लावली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये “काम अडले की रामलिंग शेरे यांच्याकडे गेलं की मार्ग निघतो” अशी ठाम भावना निर्माण झाली आहे.
रामलिंग शेरे यांची खरी ताकद म्हणजे जनतेशी असलेला थेट, मोठा आणि विश्वासाचा लोकसंपर्क.
शेतकरी, मजूर, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक – प्रत्येक घटकाच्या प्रश्नांसाठी ते सहज उपलब्ध असतात. कार्यक्रमापुरते किंवा निवडणुकीपुरते दिसणारे नेतृत्व नसून, रोजच्या जीवनात लोकांमध्ये मिसळून राहणारा हा नेता असल्यामुळे त्यांच्याशी लोक मनमोकळेपणाने संवाद साधतात.त्यांचे बोलणे संयत आहे, वागणे साधे आहे आणि निर्णय कामातून दिसतात. त्यामुळेच वेगवेगळ्या विचारधारेतील लोकही त्यांच्या कामाचे कौतुक करताना दिसतात.आज केंद्रात सत्ता आपली, राज्यात सत्ता आपली आणि स्थानिक पातळीवर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे सक्षम नेतृत्व असल्यामुळे विकासासाठी निधी आणण्याची चिंता उरलेली नाही. या संधीचा उपयोग जवळगा जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी करण्याचा संकल्प रामलिंग शेरे यांनी केला आहे.
पाणी, रस्ते, स्मशानभूमी, वीज, मंदिर, समाजमंदिर, शाळा, अंगणवाडी, तसेच शेतकरी व मजूर घटकांसाठी जिल्हा परिषदेमार्फत मिळणाऱ्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे, हे त्यांचे स्पष्ट उद्दिष्ट आहे.
आजच्या राजकारणात घोषणांपेक्षा सेवा, उपलब्धता आणि विश्वास या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरत आहेत. अक्का फाउंडेशनच्या सामाजिक कार्यातून, उपसरपंच म्हणून केलेल्या प्रभावी कामातून आणि मोठ्या लोकसंपर्कातून रामलिंग शेषराव शेरे यांनी हे सिद्ध केले आहे की, खुर्चीपेक्षा माणूस मोठा असतो.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे लोकाभिमुख नेतृत्व म्हणून रामलिंग शेरे हे जवळगा जिल्हा परिषद गटासाठी एक विश्वासार्ह, सक्षम आणि सेवाभावी पर्याय ठरत आहेत, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
*दयानंद कांबळे नागराळकर*
7887827886
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा