मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

*बोरोळ जिल्हा परिषद गट काँग्रेसकडे *रतन पाटील नागराळकरांच्या नियोजनबद्ध प्रचाराला यश*

बोरोळ जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे उमेदवार औदुंबर पांचाळ यांची विजयाकडे वाटचाल! उमेदवाराविषयी अफाट सहानुभूतीची लाट!! उमेदवारांना मतदारांकडून *वोट भी और नोट भी*

बोरोळ जिल्हा परिषद काँग्रेस पक्षाचे उमेदवार औदुंबर पांचाळ यांची विजयाकडे वाटचाल! उमेदवाराविषयी अफाट सहानुभूतीची लाट!! उमेदवारांना मतदारांकडून *वोट भी और नोट भी*  ---------------------- *देवणी* : इंदिरा काँग्रेस पक्षाने बोरोळ मतदार संघात सर्वसामान्य गरीब घरातील उमेदवार म्हणून औदुंबर पांचाळ यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली आहे पांचाळ हा लोकांभिमुख चेहरा मतदारांना मिळाल्यामुळे बोरोळ मतदार संघात त्यांच्या विषयी मोठी सहानुभूतीची लाट निर्माण झालीआहे त्यामुळे मतदारातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी लोकांतून निधी (वर्गणी) जमा करून देतआहेत त्यामुळे पांचाळ यांना *नोट भी और वोट भी* देण्याची हमी मिळत असल्याने औदुंबर पांचाळ यांचा जिल्हा परिषद बोरोळ मतदार संघ काँग्रेस पक्षाचा गड मजबूत होतांना दिसत आहे       औदुंबर पांचाळ हा मूर्ती लहान व कीर्ती महानआहे अगदी कमी वयात विद्यार्थी दाशेपासून राजकारणात आहे राजकारणाची आवड राजकारणातून समाजकारण हे उद्दिष्टे ठेऊन करीत असलेली सेवा पांचाळ यांना शिखरावर पोहचंवीणारी आहे अगदी कमी वयात ग्रामपंचायत सोसायटी स्थानिक स्वरा...

*तळेगाव पंचायत समिती गणात प्रणिता रोहित चामले यांचा विजय निश्चित – युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर*

*तळेगाव पंचायत समिती गणात प्रणिता रोहित चामले यांचा विजय निश्चित – युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर*    तळेगाव पंचायत समिती मतदारसंघातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रणिता रोहित चामले यांनी प्रचाराच्या आघाडीवर स्पष्ट वर्चस्व मिळवले असून, त्यांचा विजय निश्चित असल्याचे मत राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर यांनी व्यक्त केले आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रात अग्रगण्य असणारे भास्कर चामले यांच्या त्या सुनबाई असून, प्रणिता चामले यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या त्यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू असून, प्रत्येक गावात, प्रत्येक घटकात त्या थेट संवाद साधत आहेत. या प्रचाराची संपूर्ण धुरा युवा नेते रतन अण्णा पाटील नागराळकर समर्थपणे सांभाळत आहेत. मतदारांची मानसिकता ओळखून, विकासाची स्पष्ट दिशा समोर ठेवत, विविध शासकीय योजना व लोककल्याणकारी उपक्रमांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास कसा साधता येईल, याचा सुस्पष्ट आराखडा प्रणिता चामले मतदारांसमोर मांडत आहेत. त्यामुळे इतर उमेदवारांच्या तुलनेत त्या अधिक सक्षम व योग्य उमेदवार ...

*“खुर्चीपेक्षा माणूस मोठा असतो” – अक्का फाउंडेशनच्या सेवेतून जनतेचा विश्वास जिंकणारे भाजपचे लोकाभिमुख नेतृत्व रामलिंग शेषराव शेरे*

*“खुर्चीपेक्षा माणूस मोठा असतो” – अक्का फाउंडेशनच्या सेवेतून जनतेचा विश्वास जिंकणारे भाजपचे लोकाभिमुख नेतृत्व रामलिंग शेषराव शेरे*  ---------------------- *देवणी* :राजकारणात अनेक चेहरे येतात-जातात; परंतु सेवेच्या माध्यमातून जनतेच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण करणारे नेतृत्व फारच कमी असते. जवळगा जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रामलिंग शेषराव शेरे हे असेच एक लोकाभिमुख, सेवाभावी आणि जमिनीवर काम करणारे नेतृत्व म्हणून पुढे आले आहेत. आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर व अरविंद भैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जवळगा गटात विकासाभिमुख आणि विश्वासार्ह उमेदवार दिला असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. रामलिंग शेरे यांची ओळख केवळ राजकीय कार्यकर्ते म्हणून मर्यादित नाही. अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गरजू, होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठे कार्य उभे केले आहे. या फाउंडेशनमार्फत आजपर्यंत हजारो गरीब रुग्णांवर मोफत उपचार, विविध गावांमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, औषध वाटप, महिलांसाठी आरोग्य मार्गदर्शन, तसेच...

*महायुतीच्या घड्याळाची चाल : दावनगाव गणात सर्वसामान्यांची उमेदवार – सौ. कोमल कमलाकर फुले*

*महायुतीच्या घड्याळाची चाल : दावनगाव गणात सर्वसामान्यांची उमेदवार – सौ. कोमल कमलाकर फुले*  दावनगाव पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीच्या वतीने सौ. कोमल कमलाकर फुले या सर्वसामान्यांच्या, विशेषतः महिलांच्या आवाजाचे प्रभावी प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा विकास पुरुष आमदार संजयभाऊ बनसोडे यांच्या ठाम नेतृत्वाखाली महायुतीने दावनगाव गणात विकास, पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभाराचा स्पष्ट अजेंडा मतदारांसमोर मांडला आहे. सौ. कोमल फुले या कोणत्याही राजकीय दिखाव्याविना, साधेपणा, संयम आणि थेट जनतेशी संवाद या बळावर पुढे येत आहेत. त्यांचा प्रचार म्हणजे सभा, बॅनर किंवा घोषणा यापुरता मर्यादित न राहता घराघरात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकणे आणि त्यावर मार्ग काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न असा आहे. त्यामुळेच दावनगाव गणात “ही उमेदवार आपल्यातली आहे” अशी भावना मतदारांमध्ये दृढ होताना दिसत आहे. महायुतीचे नेतृत्व करणारे आमदार संजयभाऊ बनसोडे हे दावनगाव गणासाठी नवे नाहीत. रस्ते, पाणीप...

“विकासाची धुरा महिलांच्या हाती : वलांडी गटात नव्या पर्वाची सुरुवात”वलांडी जिल्हा परिषद गट : विकासाची परंपरा, शेतकऱ्यांचा कणा आणि उज्ज्वल भविष्याचा विश्वास

“विकासाची धुरा महिलांच्या हाती : वलांडी गटात नव्या पर्वाची सुरुवात” वलांडी जिल्हा परिषद गट : विकासाची परंपरा, शेतकऱ्यांचा कणा आणि उज्ज्वल भविष्याचा विश्वास ग्रामीण राजकारणात काही व्यक्ती आणि काही घराणी ही केवळ सत्तेसाठी नव्हे, तर समाजासाठी ओळखली जातात. वलांडी जिल्हा परिषद गट हे अशाच एका विकासनिष्ठ आणि जनतेशी नाळ जपणाऱ्या राजकीय परंपरेचे प्रतीक आहे. या गटामध्ये उषा संभाजी पाटील तळेगावकर या भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या घराण्यातील उमेदवार म्हणून जनतेसमोर उभ्या आहेत. त्यांची उमेदवारी ही अचानक आलेली नसून अनेक वर्षांच्या विकासकामांची, प्रशासनाशी असलेल्या सुसंवादाची आणि जनतेच्या विश्वासाची नैसर्गिक पुढची पायरी आहे. वलांडी गटातील विकासाचा पाया याआधीच भक्कम घातला गेला आहे. शंकर पाटील तळेगावकर यांनी सभापती असताना रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, शाळा व सार्वजनिक इमारती यांसारख्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यावर भर दिला. त्यांच्या काळात झालेली अनेक कामे आजही लोक आठवणीने सांगतात. विकास हा कागदावर नव्हे तर प्रत्यक्षात दिसला पाहिजे, हा त्यांचा दृष्टिकोन होता. त्यामुळेच वलांडी ग...

*“हलगरा जिल्हा परिषद गटात विकासाचा झंझावात; इंजि. विनायक बगदुरे यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे बदलली”*

*“हलगरा जिल्हा परिषद गटात विकासाचा झंझावात; इंजि. विनायक बगदुरे यांच्या उमेदवारीने राजकीय समीकरणे बदलली”* निलंगा तालुक्यातील हलगरा जिल्हा परिषद गटातून इंजि. विनायक बगदुरे यांची उमेदवारी अधिकृत जाहीर होताच संपूर्ण गटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनतेच्या अपेक्षा आणि बदलाची तीव्र इच्छा यांचे प्रतीक म्हणून इंजि. बगदुरे यांच्याकडे पाहिले जात असून, त्यांच्या प्रचाराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच इंजि. विनायक बगदुरे यांनी गावोगावी दौरे सुरू करत थेट जनतेशी संवाद साधला आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, शेतकरी, महिला व युवकांचे प्रश्न हे त्यांच्या प्रचाराचे केंद्रबिंदू असून, “काम बोलणार, मी नाही” ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.इंजिनिअरिंग पार्श्वभूमी असलेले, अभ्यासू आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, जिल्हा परिषदेतील कामकाजात शिस्त, पारदर्शकता आणि दीर्घकालीन नियोजन आणण्याचा त्यांचा ठाम निर्धार आहे. केवळ आश्वासनांवर नव्हे, तर कृतीवर विश्वास ठेवणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. हलगरा गटातील युवक, महि...

*विकास, विश्वास आणि भाजपाचे काम करणारे नेतृत्व : बोरोळ गटात ‘राज’ नावाचा ठाम पर्याय*

*विकास, विश्वास आणि भाजपाचे काम करणारे नेतृत्व : बोरोळ गटात ‘राज’ नावाचा ठाम पर्याय*  ---------------------- *देवणी*: तालुक्यातील बोरोळ जिल्हा परिषद गटाची निवडणूक यंदा केवळ पक्षीय गणितांवर नाही, तर भाजपाच्या विकासाच्या राजकारणावर केंद्रित झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. केंद्रात, राज्यात आणि जिल्ह्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने मांडलेली “सबका साथ, सबका विकास” ही भूमिका बोरोळ गटात प्रत्यक्षात उतरवणारे नाव म्हणून आज धोंडाराज (राज) किशनराव गुणाले यांच्याकडे पाहिले जात आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळख असलेल्या धोंडाराज गुणाले यांनी राजकारणात घोषणा कमी आणि काम अधिक या तत्वावर वाटचाल केली. नागतीर्थवाडी गावात उपसरपंच म्हणून काम करताना त्यांनी भाजपाच्या ग्रामविकास, स्वच्छता, डिजिटल इंडिया आणि शिक्षण या धोरणांना गावपातळीवर प्रत्यक्ष स्वरूप दिले. त्यामुळेच आज नागतीर्थवाडी हे गाव केवळ विकासाचे उदाहरण नसून भाजपाच्या विचारधारेचा मॉडेल ग्रामपंचायत नमुना म्हणून ओळखले जाते. देवणी तालुक्यातील सर्वप्रथम निर्मलग्राम म्हणून ओळख मिळवलेले नागतीर्थवाडी हे गाव भाजपाच्या...