मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

बालाजी रेड्डी यांच्यामुळे शिवसेनेला गती मिळाली - स्वप्नील अण्णा जाधव

बालाजी रेड्डी यांच्यामुळे शिवसेनेला गती मिळाली - स्वप्नील अण्णा जाधव  उदगीर (प्रतिनिधी )  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गतिमान करण्यासाठी आणि संघटन उभारण्यासाठी जिल्हाप्रमुख बालाजी भाऊ रेड्डी यांनी घेतलेले परिश्रम आणि त्यांनी संघटन कुशल नेतृत्व दाखवत सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन, "गाव तिथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक" मोहीम राबवल्यामुळे लातूर जिल्ह्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात शिवसेनेने चांगलेच बाळसे धरले आहे. असे विचार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उदगीर जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल (अण्णा) अनिल जाधव यांनी व्यक्त केले.  बालाजी भाऊ रेड्डी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून स्वप्नील अण्णा जाधव यांच्या मित्र परिवाराकडून बालाजी रेड्डी सत्कार आयोजित करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बालाजी रेड्डी यांना अभिष्टचिंतन करतानाच स्वप्निल अण्णा जाधव यांनी बालाजी रेड्डी यांनी ग्रामीण भागामध्ये शिवसेनेसाठी किती कष्ट घेतले, आणि संघटन उभारणीसाठी त्यांनी केलेल्या एकूण कार्याचा आढावा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला पुन्हा बळ देण्यासाठी सर्व शिवसैनिक...

सामाजिक जाणीवा जोपासणारे प्रशासकीय अधिकारी : श्री. प्रवीणजी फुलारी

सामाजिक जाणीवा जोपासणारे प्रशासकीय अधिकारी : श्री. प्रवीणजी फुलारी  ---------------------------------------     सामान्य कुटुंबातून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर मोठ्या हुद्द्यावर गेलेली लोकं सामाजिक जाण, भान जोपासत सामाजिक दायित्व स्वीकारून गोरगरिबांसाठी कामे करणारी फार कमी लोकं आहेत. त्यापैकीच छ. संभाजीनगर चे जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. प्रवीणजी फुलारी हे एक. एका शिक्षकाचा मुलगा वडिलांचे शिस्त, क्षमता आणि कर्तृत्वाची जाणीव ठेवून संस्कार घेवून प्रशासनात सामान्य, गोरगरीब यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. श्री. प्रवीणजी फुलारी साहेबांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांनी प्रशासनात राहून प्रामाणिक सेवा जोपासली त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...श्री. प्रविण बाबुराव फुलारी यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथे एका सामान्य कुटुंबात झाला. साहेबाचे वडील श्री. बाबुराव फुलारी हे शिक्षक होते त्यामुळे शिस्तीचे, संस्काराचे व अध्यात्मचे धडे त्यांना वडिलांकडूनच मिळाले. त्या बळावरच फुलारी साहेबांनी प्रशासनात आपली यशस्वी वाटचा...

शंकर बोईनवाड यांच्या पुस्तकास राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर

शंकर बोईनवाड यांच्या पुस्तकास राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर ---------------------------------------- उदगीर / प्रतिनिधी : येथील साहित्यिक तथा पत्रकार शंकर बोईनवाड यांच्या आदर्श नगरीचा राजू या किशोर कादंबरीस ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रसूल सोलापुरे बहुउद्देशीय संस्था महागाव ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर चा राज्यस्तरीय बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे.एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.    गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने लिखाण करणाऱ्या शंकर बोईनवाड यांचा " चिव चिव चिमणी " व " कोल्हेवाडीचा बाजार " ही दोन बालकवीतासंग्रह व "आदर्श नगरीचा राजू " ही किशोर कादंबरी, " परिसस्पर्श ", शैक्षणिक सेवेचा दिपस्तंभ " ही दोन संपादित अशी पाच पुस्तके प्रकाशीत आहेत. त्यांच्या साहित्य कृतीला परिवर्तन साहित्य संस्था नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिवचा परिवर्तन राज्यस्तरीय पुरस्कार, श्री. जयभवानी भक्तगण व सांस्कृतिक कला मंडळ रांझणी ता. पंढरपूर जि. सोलापूरचा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार, संत गाडगेबाबा विचारमंच ओतूर त...
लोकवैभव ई-पेपर -दिवाळी अंक २०२६ आजचा पूर्ण अंक खालील विंडोमध्ये वाचा किंवा डाऊनलोड करा. पेपर डाऊनलोड करा

*कै. रसिका महाविद्यालयाच्या कु. निकिता कांबळे खेळाडूंची लातूर जिल्हा पोलीस दलात निवड*

देवणी             कै. रसिका महाविद्यालय देवणी येथील बीएससी तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी निकिता कांबळेची लातूर जिल्हा पोलीस दलात निवड झाली आहे. त्याच्या यशा बद्दल संस्था अध्यक्ष. मा.श्री गोविंदरावजी भोपणीकर साहेब त्यांच्या शुभहस्ते निकिता कांबळेचा  सत्कार करण्यात आला. यावेळी  संस्थासचिव मा. श्री. गजाननजी भोपणीकर साहेब  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के, क्रीडा संचालक प्रा.डॉ. सचिन चामले उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी निकिता कांबळेचे  अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“कसाईखाने जा रही गायों को जीवनदान… देवनी की जानकी गौशाला में 250+ गौवंश की सेवा; रोज़ 30 हजार खर्च, फिर भी सेवा जारी!”

“कसाईखाने जा रही गायों को जीवनदान… देवनी की जानकी गौशाला में 250+ गौवंश की सेवा; रोज़ 30 हजार खर्च, फिर भी सेवा जारी!” बिना सरकारी अनुदान के खड़ी सेवा—रवींद्र महाराज देवणीकर की मानवता को समर्पित जीवन साधना देवनी (जिला लातूर) के ग्रामीण क्षेत्र में खड़ा एक कार्य आज मानवता का सच्चा अर्थ बता रहा है। रवींद्र महाराज देवणीकर द्वारा स्थापित जानकी गौशाला केवल गायों की देखभाल करने की जगह नहीं है, बल्कि यह सेवा, त्याग और करुणा का जीवंत उदाहरण बन चुकी है। इस गौशाला में वर्तमान में 250 से अधिक गौवंश का पालन-पोषण किया जा रहा है। हर एक गाय के पीछे एक दर्दभरी कहानी छिपी है—कोई दुर्घटनाग्रस्त, कोई बीमार, तो कोई मालिक द्वारा छोड़ दी गई। ऐसे सभी गौवंश को यहाँ नया जीवन मिलता है।इस सेवा का सबसे महत्वपूर्ण पहलू यह है कि कसाईखाने ले जाई जा रही गायों को बचाने का काम लगातार किया जा रहा है। गौभक्तों की मदद से और न्यायालयीन प्रक्रिया के माध्यम से कई गायों को बचाकर यहाँ लाया जाता है। यही कारण है कि रोज़ाना दो से चार गायों की संख्या बढ़ती जा रही है। मौत के मुंह से वापस लाई गई इन गायों को यहाँ केवल भोज...

शेकापूरच्या व्यंकटराव पांचाळ यांचा पुण्यामध्ये सन्मान

शेकापूरच्या व्यंकटराव पांचाळ यांचा पुण्यामध्ये सन्मान  --------------------------------------- उदगीर / प्रतिनिधी : तालुक्यातील शेकापूर येथील पेंटर, चित्रकार श्री. व्यंकटराव पांचाळ यांचा पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेवर सत्कार करण्यात आला. मुंबईच्या एका संस्थेच्या वतीने शाळा रंगरंगोटी व प्रासंगिक, समर्पक चित्र रेखाटल्याबद्दल उत्कृष्ट अशा शाळांकडून त्यांचा सन्मान करण्यात आला.    माणूस कुठे जन्मावा हे त्याच्या हातात जरी नसले तरी तो आपल्या कर्तृत्वावर सर्वदूर पोहचू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे शेकापूर येथील पेंटर व्यंकटराव पांचाळ. गेल्या काही दशकापासून उदगीर, लातूर जिल्हा व जवळपास मराठवाड्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या आपल्या कुंचल्यातून त्यांनी भिंती बोलक्या केल्या. उदगीर येथील अनेक शाळा व नगर परिषदेच्या वतीने त्यांनी रंगरंगोटी व चित्र रेखाटले. सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, बुलढाणा अशा अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळा रंगवण्याचे त्यांनी काम केले. हे करीत असतानाच त्यांनी मुंबई येथील जग्गवार लॅन्ड रोव्हर इंडिया लि. मुंबई माता बाल संगोपन ...

*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर

*लोकाभिमुख कामशैली, नवकल्पनांचा वेध आणि संवेदनशीलतेतून घडलेली प्रशासनाची नवी ओळख - सागर वरंडेकर*  देवणी तालुक्यातील प्रशासनात अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण करणारे गटविकास अधिकारी सागर सुरेश वरंडेकर हे नाव आज सर्वसामान्यांच्या विश्वासाचे केंद्र बनले आहे. कार्यतत्परता, लोकाभिमुख दृष्टिकोन आणि संवेदनशीलतेच्या बळावर त्यांनी प्रशासनाला गतिमान करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील पळसंबे या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सागर वरंडेकर यांनी ग्रामीण पार्श्वभूमीतून पुढे येत 2021 मध्ये MPSC नागरी सेवेतून गटविकास अधिकारी पद मिळवले. स्पर्धा परीक्षेच्या काळात त्यांच्या कुटुंबाचा विशेषतः लहान भावाचा मिळालेला पाठिंबा त्यांच्या यशामागे महत्त्वाचा ठरला. कार्यक्षेत्रात आल्यानंतर त्यांनी “संवाद आणि समन्वय” या सूत्रावर भर देत प्रशासनात काम करण्याची नवी दिशा दिली. कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून काम करून घेणे आणि जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यांचे निराकरण करणे ही त्यांची खास शैली ठरली आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय कामे ...

*देवणीत सेवाकुंड ट्रस्ट च्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न ; सामाजिक एकात्मतेचा संदेश* *देविदास पतंगे यांचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती*

*देवणीत सेवाकुंड ट्रस्ट च्या वतीने इफ्तार पार्टी संपन्न ; सामाजिक एकात्मतेचा संदेश*  *देविदास पतंगे यांचा उपक्रम; मान्यवरांची उपस्थिती* ---------------------- *देवणी*: शहरातील जमा मस्जिद येथे रमजान ईदच्या निमित्ताने दि. १७ मार्च २०२६ रोजी सेवाकुंड सामाजिक ट्रस्टच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश दिला. या इफ्तार पार्टीचे आयोजन माजी सरपंच देविदास पतंगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. या उपक्रमासाठी राजेंद्र संगेकर व पप्पू सूर्यवंशी यांनी संयोजक म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमास अभय साळुंखे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस), नागेश जीवने (माजी बांधकाम सभापती, जि.प. लातूर), अजित माने (माजी सभापती, पंचायत समिती निलंगा), वैजनाथ लुले, बळीराम बिरादार, सोमनाथ लुल्ले, अमरनाथ मुर्के, सुनिल चिद्रेवार, रेवण मळभागे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सेवाकुंड ट्रस्टचा सामाजिक उपक्रम. डॉ. अनिलकुमार गायकवाड या...

*नागराळ येथे श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा ऐतिहासिक सोहळा**श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते भूमिपूजन; हजारोंच्या साक्षीने धर्मसंस्कृतीचा जागर*

*नागराळ येथे श्री गुरुलिंगेश्वर मठाच्या जिर्णोद्धाराचा ऐतिहासिक सोहळा* *श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते भूमिपूजन; हजारोंच्या साक्षीने धर्मसंस्कृतीचा जागर* देवणी : देवणी तालुक्यातील नागराळ येथील प्राचीन व ऐतिहासिक श्री गुरुलिंगेश्वर मठ संस्थान येथे मठाच्या जिर्णोद्धार व नव्या बांधकामाचा भव्य धार्मिक सोहळा सोमवारी अत्यंत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. उज्जैनी महापीठाचे परमपूज्य श्री श्री श्री १००८ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते मठाच्या जिर्णोद्धाराचे भूमिपूजन करण्यात आले. या सोहळ्यास नागराळ गावासह देवणी तालुक्यातील तसेच परिसरातील अनेक गावांमधून हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहिल्याने संपूर्ण परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.नागराळ येथील गुरुलिंगेश्वर मठाला तब्बल ७५ वर्षांनंतर मठाधीश लाभल्याचा ऐतिहासिक क्षण या सोहळ्यामुळे साकार झाला. नागराळ येथील मठाधीश म्हणून श्री म. नि. प्र. सिद्धलिंग महास्वामीजी यांच्या रूपाने गुरुपरंपरेचा नवा अध्याय सुरू झाला असून ...

*तळेगावच्या ग्रामदैवत महादेवाच्या साक्षीने उषाताई संभाजी पाटील यांची ऐतिहासिक निवड – तालुक्याच्या विकासासाठी नवे पर्व*

तळेगावच्या ग्रामदैवत महादेवाच्या साक्षीने उषाताई संभाजी पाटील यांची ऐतिहासिक निवड – तालुक्याच्या विकासासाठी नवे पर्व*  ---------------------- *देवणी* तालुक्यातील तळेगाव हे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावाचे जज्वल ग्रामदैवत असलेले महादेव मंदिर हे केवळ श्रद्धेचे केंद्र नसून गावाच्या एकात्मतेचे प्रतीक मानले जाते. विशेषतः सोमवार हा महादेवाचा पवित्र दिवस असल्याने या दिवशी मंदिरात मोठ्या भक्तिभावाने पूजा-अर्चा केली जाते आणि गावातील अनेक महत्त्वाचे निर्णयही या दिवशी घेण्याची परंपरा आहे. अशाच पवित्र सोमवारी तालुक्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरलेली घटना घडली – उषाताई संभाजी पाटील यांची जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड. उषाताई पाटील यांची ही निवड केवळ एका पदाची प्राप्ती नसून तालुक्यातील जनतेने विकास, पारदर्शकता आणि प्रामाणिक नेतृत्वावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक मानली जात आहे. महादेवाच्या आशीर्वादाने तळेगावच्या मातीतून उभे राहिलेले हे नेतृत्व आज संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या नेतृ...

सुनिल कल्लूरकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

सुनिल कल्लूरकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर  --------------------------------------- उदगीर / प्रतिनिधी :  उदगीर येथील साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील मराठी विभाग प्रमुख सुनिल तुकाराम कल्लूरकर यांची लोककला,कलावंत, साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य,श्रीरामपूर जि. अहिल्यानगरच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक जाहीर झाला आहे. येत्या काही दिवसात एका विशेष समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे संयोजकानी कळविले आहे.  श्री. सुनील कल्लूरकर यांना यापूर्वी दोन वेळेस डॉ. ना य. डोळे आदर्श शिक्षक पुरस्कार, लायन्स क्लब उदगीर यांच्यातर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार, कै. विलास भोसले मित्र मंडळ, उदगीर तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार,लिओ क्लब उदगीरचा आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच समृद्धी प्रकाशन हिंगोली येथील स्व. मारोतराव कऱ्हाळे राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार. आदी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.  हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे उदगीर येथील नव समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब कज्जेवाड, सचिव मनोजद...

*जि.प.पंस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका संपल्या! आता लक्ष देवणी नगरपंचायतीकडे...?*

*जि.प.पंस स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका संपल्या! आता लक्ष देवणी नगरपंचायतीकडे...?* -------------------- *देवणी* : जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नुकत्याच संपल्याआहेत या निवडणुकीत सर्वच पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लागली देवणी तालुक्यात तीन गट व सहागणपैकी दोन जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व कायम राखले तर एका गटात काँग्रेस पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केलं पंचायत समिती गणात भारतीय जनता पक्ष(4 ) काँग्रेस( 1 )व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (1) अजितदादा पक्षाने बाजी मारली देवणी पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात ठेवण्यात यश मिळाले आहे येत्या आठ नऊ महिण्यात देवणी नगर पंचायतीची मुद्दत संपतअसून निवडणूक कार्यक्रम लागणार आहे भाजपाला मिळालेलं यश पाहून देवणी नगर पंचायतीसाठी कार्यकर्ते यांनी मोर्चा बांधणी चालू केली आहे देवणी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी आरक्षित झालेआहे सदर निवडणुक ही जनतेतून असल्यामुळे नगराध्यक्ष हा लोकांतून निवडला जाणार आहे त्यामुळे ही निवडणूक अतिशय चूरशीची होणार आहेत सर्वच समाजात ...

*गजानन भोपणीकरांनी शैक्षणिक क्रांतीसह राजकारणातही क्रांती केली - प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे*

*गजानन भोपणीकरांनी शैक्षणिक क्रांतीसह राजकारणातही क्रांती केली - प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे* ---------------------- *देवणी*: रसिका शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शालाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी केजी टू पीजी पर्यन्तचे सर्वच शिक्षण देवणी शहरात उपलब्ध करून देऊन शिक्षणात क्षेत्रात मोठी क्रांती निर्माण केली तसेच नुकत्याच झालेल्या पंचायत समिती बोरोळ गणातून निवडणूकित लातूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान घेऊन विजयी होऊन राजकारणातही मोठी क्रांती घडविली असल्याचे मत रसिका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत जावळे यांनी व्यक्त केले      सविस्तर माहिती अशी की रसिका महा विद्यालयाचे सचिव श्री गजानन भोपणीकर हे बोरोळ पंचायत समिती गनातून बहुमताने निवडून आल्यामुळे रसिका शैक्षणिक संकुलतील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदराव भोपणीकर होते तर व्यासपीठावर रामभाऊ भोपणीकर,सत्यदेव गरड, प्रताप कोयले उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे यांनी केले य...

*बोरोळ जिल्हा परिषद गट काँग्रेसकडे *रतन पाटील नागराळकरांच्या नियोजनबद्ध प्रचाराला यश*

*बोरोळ जिल्हा परिषद गट काँग्रेसकडे *रतन पाटील नागराळकरांच्या नियोजनबद्ध प्रचाराला यश*  देवणी | प्रतिनिधी — सध्या पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बोरोळ जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार औदुंबर पांचाळ विजयी झाले आहेत. देवणी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद जागांपैकी एक जागा काँग्रेसला मिळाल्याने राजकीयदृष्ट्या या निकालाकडे महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे. या निकालामागे काँग्रेसचे तालुकास्तरावरील संयोजक रतन पाटील नागराळकर यांनी केलेला नियोजनबद्ध प्रचार, संघटनात्मक बांधणी आणि सातत्यपूर्ण संपर्क हे महत्त्वाचे घटक ठरल्याचे पक्षांतर्गत सांगितले जात आहे. प्रचाराच्या सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत रतन पाटील नागराळकर यांनी गटातील प्रत्येक गाव, वाडी-वस्ती येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवले.रतन पाटील नागराळकर हे उदगीर पंचायत समितीचे पहिले सभापती स्व. मलशेट्टी आप्पा पाटील नागराळकर यांचे नातू असून माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप पाटील नागराळकर यांचे पुतणे आहेत. सार्वजनिक जीवनाची पार्श्वभूमी असली, तरी या निवडणुकीत त्यांनी वैयक्तिक श्रेयापेक्षा...

*लातूर जिल्हा परिषदत जनमताचा संमिश्र कौल, काँग्रेसची झेप; भाजपाची घसरगुंडी! सत्तेच्या चाव्या अजित पवार गटाच्या हाती*

*लातूर जिल्हा परिषदत जनमताचा संमिश्र कौल, काँग्रेसची झेप; भाजपाची घसरगुंडी! सत्तेच्या चाव्या अजित पवार गटाच्या हाती* लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागांचे निकाल जाहीर झाले असून, जिल्ह्याच्या राजकारणाने एका अत्यंत रंजक वळणावर प्रवेश केला आहे. या निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने जिल्ह्याच्या सत्तेचा पेच निर्माण झाला असला, तरी सत्तेची खरी सूत्रे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या हाती एकवटली आहेत. काँग्रेसने २३ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरून आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असला, तरी बहुमताचा ३० हा आकडा गाठण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. दुसरीकडे, गेल्या निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची १८ जागांवर झालेली घसरण हा या निकालाचा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. या निकालाचे सविस्तर विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, काँग्रेसने आपल्या जागांची संख्या १५ वरून २३ वर नेत मोठी मुसंडी मारली आहे. ग्रामीण भागात काँग्रेसची पकड अजूनही मजबूत असल्याचे या निकालाने सिद्ध केले आहे, मात्र विजयाचा गुलाल उधळण्यास...

गुरुकुलातील पाठशाळेच्या संस्कारक्षम अध्यापनाचा पवित्र वारसा प्रामाणिकपणे चालविणारा सच्चा शिक्षक : ज्ञानेश्वर बडगे

गुरुकुलातील पाठशाळेच्या संस्कारक्षम अध्यापनाचा पवित्र वारसा प्रामाणिकपणे चालविणारा सच्चा शिक्षक : ज्ञानेश्वर बडगे ---------------------------------------- " संता नाही कुळ याति!शिंपल्यापोटी जन्मे मोती! " या अनुभवजन्य स्वाभाविक संत वचनास स्वतःच्या कृती - युक्तीने सत्यता प्राप्त करून देणाऱ्या ज्ञानेश्वर बडगे सरांचा जन्म दारिद्रय व अज्ञानाच्या चिखलात खोलवर रुतून -- फसून बसलेल्या , उपेक्षा व अपमानामुळे होणाऱ्या मानसिक वेदनेचे असह्य चटके सहन करीत जीवन जगत आलेल्या, गती - शक्ती व प्रगतीचा उत्साह हरवून बसलेल्या , असंख्य अडचणी व चिंतेच्या वर्तुळात - कोषल्यात कोषकिटकासम अडकलेल्या बहुजनातील सामान्य कुटुंबात उच्वर्णीयानी केवळ स्वार्थापोटी निर्माण केलेल्या हजारो जाती - पोटजातीतील संख्येनी अत्यल्प असलेल्या गोंधळी जातीत झाला. या जातीत जन्मलेले लोक लोकरंजनातून लोकांचे मनोबल वाढवून आयुष्यवृद्धी करणारा लोकरंजनाचा हा धंदा - व्यवसाय आपल्या व मुलाबाळांच्या पोटाला चटणी भाकर देणारी हक्काची वतनदारी समजून पिढ्यानपिढ्या करीत व मरत आले होते. बडगे सरांचे वडील उपजत तेजस्वी , चलाख बुध्दीचे होत...

*“गावासाठी झटणारं नेतृत्व हवं असेल तर हातात हात द्या – सुरेखा सोनकाबळे”*

*“गावासाठी झटणारं नेतृत्व हवं असेल तर हातात हात द्या – सुरेखा सोनकाबळे”* देवणी तालुक्यातील जवळगा पंचायत समिती गणामध्ये यंदाची निवडणूक ही केवळ पदासाठी नसून, विकास, विश्वास आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर होणारी निवडणूक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुरेखा यशवंत सोनकाबळे या सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या, शांत पण ठाम नेतृत्व म्हणून जनतेच्या विश्वासाचे केंद्र बनत आहेत.काँग्रेस पक्षाची ओळख ही नेहमीच गोरगरीब, शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहणारी राहिली आहे. हात हे निवडणूक चिन्ह केवळ एक चिन्ह नसून, तो आधार, मदत आणि विकासाचा हात आहे. याच विचारधारेतून सुरेखा सोनकाबळे या जवळगा गणात काम करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत.ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि महिलांचे प्रश्न यांची त्यांना प्रत्यक्ष जाणीव आहे. “गावापर्यंत विकासाची गंगा पोहोचवायची” ही त्यांची स्पष्ट भूमिका असून, प्रशासनाकडून होणारी दिरंगाई थांबवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचा त्यांचा मानस आहे. महिलांना सक्षम करणे हेच खरे परिवर्तन असल्या...

*बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे धोंडराज किशनराव गुणालेची प्रचारात बाजी विरोधकांचे धाबे दणाणले - बालाजी सूर्यवंशी देवणीकर* .

*बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे धोंडराज किशनराव गुणालेची प्रचारात बाजी विरोधकांचे धाबे दणाणले - बालाजी सूर्यवंशी देवणीकर* . --------------------- *देवणी* तालुक्यातील बोरोळ जिला परिषद मतदार संघात भारतीय जनता पक्षाची मोठी लाट निर्माण झाली आहे धोंडराज गुणाले यांची विजयाकडे वाटचाल चालू आहे त्यामुळे विरोधकांचे धाबे दनाणाले आहेत असे मत भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बालाजी सूर्यवंशी देवणीकर यांनी व्यक्त केले देवणी तालुक्यात सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आहेत भारतीय जनता पक्षाने कमळ चिन्हाच्या जोरावर गावोगावी पकड मजबूत केली असून, बोरोळ जिल्हा परिषद गटात भाजपचे अधिकृत उमेदवार धोंडराज किशनराव गुणाले हे प्रचारात स्पष्टपणे पुढे असल्याचे चित्र दिसत आहे. शेवटच्या टप्प्यात गुणाले यांनी घेतलेली मेहनत, सततचा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची फौज आणि तालुक्यात झालेली विकासकामे यामुळे विरोधकांची धावपळ वाढली असून प्रचाराची दिशा पूर्णपणे भाजपच्या बाजूने वळली आहे. धोंडराज किशनराव गुणाले हे केवळ उमेदवार म्हणून नव्हे, तर कामातून ओळख निर्माण ...

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*

*“एक संसार, दोन शिक्षक… आणि समाजासाठी आयुष्यभराची शिदोरी”*   आजचा दिवस श्री. सुनील शांतप्पा क्षीरसागर (माजी मुख्याध्यापक) आणि सौ. मिनाक्षी सुनील क्षीरसागर यांच्या आयुष्यातील एक अत्यंत गौरवशाली क्षण आहे. त्यांच्या विवाहाला आज ३३ वर्षे पूर्ण होत असून, हा केवळ वैवाहिक सहजीवनाचा टप्पा नाही, तर संस्कार, शिक्षण, संयम आणि सामाजिक बांधिलकीने समृद्ध झालेल्या सहप्रवासाचा उत्सव आहे. दोघेही उच्चशिक्षित, पेशाने शिक्षक आणि विचाराने समाजघडविणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. शिक्षक हा केवळ व्यवसाय नसून तो एक संस्कार आहे, हे त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या कार्यातून दाखवून दिले. अध्यापन, शिस्त, विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी केलेले प्रयत्न आणि शिक्षणव्यवस्थेतील निष्ठा या साऱ्या बाबी त्यांच्या कार्यकाळात ठळकपणे जाणवतात. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहताना आपसूकच हे शब्द आठवतात   *शब्दांनी शिकवलं नाही, जगून दाखवलं ज्ञान,वर्गात घडले विद्यार्थी, घरात फुलला सन्मान,३३ वर्षांचा हा प्रवास — संस्कारांचीच ओळख पटवणारा महान* .* श्री. सुनील क्षीरसागर यांनी मुख्याध्यापक म्हणून कार्य करताना के...